Good News For Mumbai Indians After Punjab King Defeat From Delhi Capitals In IPL Playoffs Scenario ; पंजाबच्या पराभवानंतर मुंबईसाठी गुड न्यूज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धरमशाला : सामना न खेळताही रोहित शर्माची चिंता मिटल्याचे पाहायला मिळाले. कारण दिल्ली आणि पंजाबच्या सामन्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यावर मुंबई इंडियन्यचेे भवितव्य अवलंबून होते. जर या सामन्यात पंजाबचा संघ विजयी ठरला असता तर मुंबई इंडियन्सला धक्का बसला असता आणि रोहित शर्माची चिंता वाढली असती. पण या सामन्यात दिल्लीने पंजाबवर दमदार विजय साकारला आणि त्यामुळे आता हा सामना संपल्यावर मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे.

मुंबईचा सामान नसला तरी गुणतालिकेत त्यांचे धाबे या सामन्यामुळे दणाणले होते. लखनौच्या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. पण या सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि लखनौने दोन गुणांची कमाई केली. लखनौचा संघ यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. विजयासह त्यांनी मुंबईच्या संघाला धक्का दिला आणि त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाने सहा विजयांसह १२ गुण मिळवले होते. दिल्लीच्या सामन्यात जर पंजाबच्या संघाने विजय मिळवला असता तर त्यांचे १४ गुण झाले असते. त्यामुळे मुंबई आणि पंजाब यांच्यात समान १४ गुण झाले असते. विजयानंतर पंजाबचा रनरेट सुधारला असता आणि ते रनरेटच्याबाबतीत मुंबईच्या पुढे जाऊ शकले असते. त्यामुळे या विजयानंतर पंजाबचा संघ हा चौथ्या स्थानावर जाऊ शकला असता आणि त्यामुळे मुंबईचा संघ हा अव्वल चार संघांमधून बाहेर पडला असता आणि त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली असती. पण दिल्लीच्या संघाने यावेळी पंजाबच्या संघाचा पराभव केला. त्यामुळे आता ते मुंबईच्या संघाला सध्या तरी धक्का देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुंबई ही चौथ्या स्थानावर कायम राहणार असून ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

या पराभवानंतर पंजाबचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. कारण आता त्यांना आयपीएलच्या क्वालिफायर-१ या सामन्यात खेळता येणार नाही.

[ad_2]

Related posts