Cheteshwar Pujara Took Revenge Of BCCI ; पुजाराने अपमानाचा बदला घेत बीसीसीआयची केली बोलती बंद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारातच्या चेतेश्वर पुजाराने एका फटक्यात बीसीसीआयची बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे. पुजाराने रागाच्या भरात एक अशी गोष्ट केली आहे की, आता बीसीसीआय त्याच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही.

पुजारा हा भारतीय फलंदाजीचा कणा आहे, असे म्हटले जाते. पण विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो अपयशी ठरला आणि त्याला बीसीसीआयच्या निवड समितीने थेट संघातून बाहेर काढले. भारतीय संघातील काही खेळाडू सातत्याने अपयशी ठरत असले तरी त्यांना संधी देण्यात येते. पण पुजारा या सामन्यात अपयशी ठरला आणि बीसीसीायच्या निवड समितीने त्याला थेट संघाबाहेर काढले. ही गोष्ट पुजाराच्या जिव्हारी लागली. पण पुजारा शांत दिसत असला तरी तो हा अपमान विसरला नाही. या अपमानाचा बदला त्याने असा काही घेतला की, आता बीसीसीआय त्याच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही.

पुजारा हा एक सभ्य क्रिकेटपटू आहे. त्यामुळे तो कोणताही आक्रस्ताळेपणा करत नाही. पण आपल्या अपमानाचा बदला मात्र पुजाराने आपल्या खेळाच्या रुपातच घेतला आहे. भारतीय संघाने त्याला एका सामन्यात अपयशी ठरल्यावर संघाबाहेर केले. त्यानंतर पुजारा थांबला नाही. पुजाराने जोरदार सराव केला आणि त्याने बीसीसीआयच्या स्पर्धेतच सहभागी होण्याचे ठरवले. बीसीसीआयच्या दुलीप करंडक स्पर्धेच तो सहभागी झाला. या स्पर्धेच्या पश्चिम विभागाकडून खेळताना पुजाराने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी साकारली, पण तो एवढ्यावर थांबला नाही. पुजाराने दुसऱ्या डावात धडाकेबाज शतक झळकावले आणि बीसीसीआयच्या निवड समितीला चोख उत्तर दिले. पुजाराने या दुसऱ्या डावात १४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १३३ धावांची भन्नाट खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर आता पुजारा पुन्हा एकदा भारतीय संघातील स्थान मिळवू शकतो, असे म्हटले जात आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

सध्याच्या घडीला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आले आणि या संघात पुजाराची निवड करण्यात आलेली नाही. पण संघाबाहेर जात पुजाराने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली व संघाचे दार ठोठावले आहे. आता पुजारा पुन्हा कधी भारतीय संघात दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

[ad_2]

Related posts