Suryakumar Yadav And Cheteshwar Pujara Team Reaches In Final Of Duleep Trophy 2023; सेमीफायनल न जिंकताच दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये सूर्या-पुजाराचा संघ, अंतिम फेरीत या संघाशी भिडणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरू: पश्चिम विभागाने दुलीप करंडक २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मध्य विभागाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शनिवारी अनिर्णित राहिलेल्या अंतिम फेरीत प्रवेश केला. १२ जुलैपासून एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल ज्यामध्ये पश्चिम विभागाचा सामना दक्षिण विभागाशी होईल. ३९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य विभागाला स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत ४ बाद १२८ धावाच करता आल्या. टी ब्रेकनंतरचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही.

पूर्ण खेळ होऊ शकला नाही

उर्वरित सहा विकेट्स मिळवून पश्चिम विभागाला विजयाची संधी होती मात्र पावसामुळे ते शक्य झाले नाही. पश्चिम विभागाने मात्र पहिल्या डावात ९२ धावांची आघाडी घेतली होती, जी सामना अनिर्णित राहिल्यास अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेशी होती. पश्चिम विभागाने पहिल्या डावात २२० धावा केल्या, त्या प्रत्युत्तरात मध्य विभागाचा संघ केवळ १२८ धावाच करू शकला. भारतीय संघातून बाहेर पडलेल्या चेतेश्वर पुजाराच्या १३३ धावांच्या जोरावर पश्चिम विभागाने आपल्या दुसऱ्या डावात २९७ धावा केल्या.

सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात ९ बाद २९२ धावांपर्यंत मजल मारली, मात्र केवळ ५ धावांची भर घालून संपूर्ण संघ बाद झाला. मोठ्या लक्ष्यासमोर त्यांनी मध्य विभागाचा सलामीवीर विवेक सिंग आणि हिमांशू मंत्री यांचे विकेट लवकर गमावल्याने त्यांची दोन बाद १७ अशी अवस्था झाली. ध्रुव जुरेल (२५) याने चांगली सुरुवात केली पण डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जडेजाने यष्टिरक्षक हेत पटेलच्या हातून त्याला यष्टीचित केले. यामुळे ३ विकेट्सवर ५५ धावा झाल्या.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

आयपीएल स्टार रिंकू सिंगने ३० चेंडूत ४० धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यात ३ षटकार आणि तब्बल ४ चौकारांचा समावेश होता. डाव्या हाताचा फलंदाज लांब शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला. पावसामुळे सामना अनिर्णित राहण्याचा निर्णय झाला तेव्हा अमनदीप खरे २७ आणि उपेंद्र यादव १८ धावांवर खेळत होते.

दक्षिण विभाग २ गडी राखून विजयी

स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा २ गडी राखून पराभव केला. दक्षिण विभागाला विजयासाठी २१५ धावांचे लक्ष्य होते. संघाने ३७ व्या षटकात ८ गडी गमावून लक्ष्य गाठले. मयंक अग्रवालने ५४ तर कर्णधार हनुमा विहारीने ४३ धावा केल्या. पहिल्या डावात १९८ धावा केल्यानंतर उत्तर विभागाने दक्षिण विभागाला १९५ धावांवर रोखले. उत्तर विभागाने दुसऱ्या डावात २११ धावा केल्या होत्या. स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना १२ जुलैपासून बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग या दोन संघांमध्ये खेळवला जाईल.

[ad_2]

Related posts