Rohit Sharma Make Big Record, Surpassing Virender Sehwag And Sunil Gavaskar ; रोहित शर्माची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, सेहवाग आणि सुनील गावस्कर यांना मागे टाकत रचला विक्रम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : रोहित शर्माने पहिल्याच कसोटी सामन्यात आता रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. कारण रोहितने नवा विक्रम रचताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडलेले आहे.

दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा हा भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले. रोहितला हा पहिल्या दिवशी ३० धावांवर होता, तर यशस्वी हा ४० धावांवर होता. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र रोहित हा यशस्वीपेक्षा जास्त आक्रमक खेळत असल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने यावेळी दमदार फटके लगावले आणि कमी चेंडूंमध्ये जास्त धावा जमवण्यचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रोहितने यावेळी सेहवाग आणि गावस्कर यांच्यासारख्या दिग्गज सलामीवीरांनाही मागे टाकले आहे.

गावस्कर आणि सेहवाग यांनी भारतासाठी सलामीला येताना १०१ वेळा अर्धशतकापेक्षा जास्त खेळी साकारली होती. रोहितने त्यांच्या या विक्रमाशी हा सामना सुरु होण्यापूर्वी बरोबरी केली होती. पण या सामन्यात रोहितने भन्नाट अर्धशतक झळकावले. त्यामुळे रोहितने १०२ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच त्याने सेहवाग आणि गावस्कर यांना पिछाडीवर टाकले आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी आहे तो भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. सचिनने तब्बल १२० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यामुळे आता रोहित सचिनचा हा विक्रम मोडणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

रोहितने या सामन्यात अजून एक विक्रम रचला आहे. रोहितने आपलाच विक्रम यावेळी मोडीत काढला आहे. रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर एकदा आला होता. तेव्हा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने खेळवण्यात आले आहे. २०१६ साली झालेल्या पहिल्या सामन्यात रोहितला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. पहिल्या डावात त्याने ९ आणि दुसऱ्या डावात त्याने ४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना रोहित खेळला नव्हता. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या भूमीत रोहितची कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या ही ४१ होती. पण रोहितने यावेळी अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच वेस्ट इंडिजमधील आपली सर्वाधिक धावसंख्या पूर्ण केली. त्यामुळे रोहित आता या दौऱ्यात चांगला खेळेल, असे म्हटले जात आहे. या दौऱ्यात जर रोहित फॉर्मात आला तर भाराताच या गोष्टीचा फायदा वनडे विश्वचषकात होऊ शकतो.

[ad_2]

Related posts