[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईतील ७ तलावांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सुरुवातीला मुंबईतील तुलसी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर विहार तलावही ओव्हरफ्लो झाला. आता पालिकेने दिलेल्या माहितीनुसार तानसा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे.
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. पालिकेने ट्विटपवरून याबाबत माहिती दिली. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव २६ जुलैला पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लागला, असे ट्विट पालिकेने केले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावानंतर आता विहार तलावही भरला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तुळशी तलावापाठोपाठ आता विहार तलाव भरला आहे.(Vihar Talav which supplies water to Mumbai overflows)
मुंबईकरण्णा पानीसपरी कर्ण-या 7 तलावत विहार तलाव आज (26 जुलै 2023) मध्यरात्री 00.48 मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लगा आहे, असं ट्विट करत पालिकेने ही माहिती दिली.
हेही वाचा :
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार तलाव आज (२६ जुलै २०२३) मध्यरात्री ००.४८ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.#BMC #BmcUpdates pic.twitter.com/ngw6QjQTuw
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलैच्या मध्यरात्री 00.48 वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
सध्या १० टक्के पाणीकपात आहे
मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही पाणीकपात मागे घेतली जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
[ad_2]