Why Rohit Sharma Not Given Chance To Bat Virat Kohli After Scoring Century ; रोहितने कोहलीला सलग दुसऱ्या सामन्यात बॅटिंग का दिली नाही, जाणून घ्या त्यामागचं खरं कारण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : विराट कोहली सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. पण शतक झळकावल्यानंतर रोहितने कोहलीला एकही संधी दिली नाही. गेल्या दोन डावांत रोहितने कोहलीला फलंदाजीलाच पाठवलेल नाही. यामागे नेमकं कारण आहे तरी काय, हे आता समोर आले आहे.

कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दमदार शतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात कोहलीला फलंदाजीला रोहितने पाठवेल नाही. त्यानंतर पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या पाच विकेट्स पडल्या होत्या, पण त्यावेळीही रोहितने कोहलीला फलंदाजीला जाण्याची संधी दिली नाही. कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो खरा, पण या दोन्ही डावांत रोहितने त्याला फलंदाजीसाठी मात्र मैदानात उतरवले नाही. रोहितने नेमकं असं का केलं, याचं कारण आता समोर आले आहे.

रोहित आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असे म्हटले जात होते. पण त्याचा परीणाम संघावर होऊ नये, असे सर्वांना वाटते. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहितने इशान किशनला कोहलीच्या जागी फलंदाजीला पाठवले होते. इशानने त्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर पहिल्या वनडे सामन्यात रोहितने तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादवला संधी दिली, पण त्याला या संधीचा फायदा उचलता आला नाही. रोहित आणि संघ व्ययवस्थापन सध्याच्या घडीला भारतीय संघात प्रयोग करत आहेत. संघातील युवा खेळाडूंना जास्त संधी मिळावी, असे रोहितने यापूर्वीही सांगितले होते. त्यानुसार इशानला कसोटीत कोहलीच्या जागेवर पाठवण्यात आले, तर वनडेमध्ये कोहलीच्या जागी सूर्याला संधी देण्यात आली. कोहली हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याला कामगिरीत सातत्य कसे टिकवायचे हे चांगले माहिती आहे. पण युवा खेळाडूंना आता संधी दिली तर त्याचा फायदा भविष्यात संघाला होऊ शकतो, त्यामुळे कोहलीला फलंदाजीला न पाठवता रोहितने युवा खेळाडूंना संधी देणे पसंत केले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारतीय संघ सध्याच्या घडीवा वर्ल्ड कपची तयारी करत आहे. त्यामुळेच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये मोठे प्रयोग केले होते.

[ad_2]

Related posts