Team India All Out In 181 Runs After 90 Runs Opening Stand In IND vs WI 2nd ODI ; दमदार सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला, दुसऱ्या वनडेत फलंदाजांची पुन्हा हाराकिरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बार्बाडोस : भारतीय संघाची दुसऱ्या वनेडमध्येही दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या वनडेत भारताला ११५ धावा करताना पाच फलंदाज गमवावे लागले होते. त्यानंतर आता दुसऱ्या वनडेत भारताला २०० धावांता टप्पा ओलांडण्यातही अपयश आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत असताना भारताचा डाव हा १८१ धावांत आटोपला. भारताची या सामन्यात बिनबाद ९० अशी दमदार सुरुवात झाली होती. त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ १०० धावाही करू शकला नाही.

भारतीय संघाला यावेळी ९० धावांची दमदार सलामी मिळाली होती. कारण इशान किशन आणि शुभमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. इशानने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले खरे, पण पुन्हा एकदा तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला. इशानने या सामन्यात सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. गिल यावेळी अर्धशतकाच्या जवळ आला तो, पण तो ३४ धावांवर बाद झाला. हे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि त्यानंतर भारताचा डाव गडगडायला सुरुवात झाली.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

संजू सॅमसनला या सामन्यात संधी देण्यात आली होती. पण तो यावेळी फक्त ९ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलला यावेळी चौथ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. पण त्याला फक्त एकच धाव करता आली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या खेळायला आला. पण पंड्याला यावेळी सात धावाच करता आल्या. त्यानंतर काही काळ सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केली खरी, पण तो २४ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी काही काळ फलंदाजी केली खरी. पण जडेजा यावेळी १० धावा करू शकला, तर शार्दुलने १६ धावा केल्या. ही भारतासाठी अखेरची आशा होती. कारण त्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. यावेळी भारताला ११ अवांतर धावा आंदण मिळाल्या आणि त्यामुळे त्यांचा डाव १८१ धावांवर सर्व बाद झाला.

[ad_2]

Related posts