IND vs PAK World Cup Match 2023 Date Rescheduled to 14th October; भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली! वर्ल्डकपमध्ये आता या दिवशी होणार ‘काँटे की टक्कर’

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: विश्वचषक २०२३ स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना आता एक दिवस आधी म्हणजेच १५ ऑक्टोबरऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. यासंबंधित अधिकृत घोषणा बीसीसीआय आणि आयसीसीकडून आजच केली जाणार आहे. तारीख नक्कीच बदलली आहे, पण हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयसीसीच्या संमतीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पर्धेच्या वेळापत्रकात आणखी काही मोठे बदल करण्यात आले आहेत. आजच म्हणजेच ३१ जुलै रोजी या बदलांविषयी अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

नवरात्रोत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नऊ दिवस चालणारा हा सण गुजरातमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देश-विदेशातून लोक या ठिकाणी येतात. भारत-पाकिस्तान सामन्यातही असेच वातावरण असेल. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सीने बीसीसीआयला एकाच वेळी लाखो लोकांच्या सुरक्षेबाबत आधीच इशारा दिला होता. तेव्हापासून भारतीय क्रिकेट बोर्ड नव्या तारखांचा विचार करत होते.

भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय इतर तीन देशांनीदेखील त्यांच्या वेळापत्रकात बडा करण्याबाबत बीसीसीआयला सांगितले होते. यासंबंधितही काही बदल केले जाणार आहेत. ज्या संघाच्या सामन्यामध्ये सहा ते सात दिवसांचा फरक आहे त्या सामान्यांच्या तारखांमध्ये बदल केले जातील, असे सांगण्यात येत आहे.

भारतातील सणांचा हंगाम

नवरात्रोत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नऊ दिवस चालणारा हा सण गुजरातमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देश-विदेशातून लोक येतात. भारत-पाकिस्तान सामन्यातही असेच वातावरण असेल. त्यामुळे एका वेळी लाखोंना सुरक्षा देणे अवघड जाणार आहे. नवरात्रीनंतर, भारतातील सर्वात मोठा सण दीपावली येईल, त्यानंतर छठ सण येणार आहे. यादरम्यान भारतीय संघ आपले सामने खेळणार आहे.

चाहत्यांचे नुकसान होणार

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखा बदलणे अनेक चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे; कारण हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते अहमदाबादला पोहोचतील. अनेक चाहत्यांची फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग १५ ऑक्टोबरला करण्यात आले आहे, मात्र आता या सामन्याचे वेळापत्रक बदलल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. १५ ऑक्‍टोबरला सकाळी अहमदाबादमध्ये पोहोचण्यासाठी अनेकांनी बुकिंग केले आहे. त्यामुळे या बदलत्या तारखांनी तर सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

[ad_2]

Related posts