Supreme Court Hearing On Manipur Violence Cji Dy Chandrachud Said Situation Is Beyond Control Of Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supreme Court On Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) काही थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. मणिपूर प्रकरणावर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली असून या प्रकरणी न्यायालयाने पोलीस प्रशासनावर कडक शब्दात टीप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या पोलिस महासंचालकांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. मणिपूरमधील परिस्थिती राज्यातील पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर असल्याची टीप्पणीही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 160 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवले आहेत. मात्र, अद्यापही येथील हिंसाचार सुरुच आहे. आतापर्यंत शेकडो लोक बेघर झाले आहेत.

 

 

 

 

 



[ad_2]

Related posts