DNA test helps Rajasthan farmer reunite cow after two years; चोरीला गेलेल्या वासराची गायीशी पुनर्भेट, मालकाचा दोन वर्षांचा संघर्ष

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर : राजस्थानमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. शेतकऱ्याचे आपल्या जनावरांवर किती प्रेम असते हे या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. चुरु जिल्ह्यातील शेतकरी दुलाराम यांच्या गोठ्यातून काही चोरांनी वासराला चोरले. दुलाराम यांनी या वासराला आपल्या पोटच्या मुलासारखं वाढवलं होतं, त्यामुळे चोरीच्या घटनेनंतर त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी वासराचा शोध घ्यायला सुरुवात केली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांना वासरू मिळाले. मात्र, हे वासरु तुमचे कशावरून? असा प्रश्न विचारत चोर शिरजोर होऊ लागला. यानंतर आपल्या वासराला परत मिळवण्यासाठी दुलाराम यांनी आकाश पाताळ एक केलं. तब्बल दोन वर्ष पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्या. परंतु, तरीही दखल न घेतल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी टॉवरवर चढून न्याय मागितला. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले.त्याचं झालं असं की, दुलाराम यांनी चोरी झालेल्या वासराच्या आईची डीएनए चाचणी केली. त्यानंतर चोरी झालेल्या वासराचा डीएनए चेक करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर जेव्हा दोन्ही गायींचे डीएनए एकच आले तेव्हा चोरी झालेली गाय दुलाराम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तब्बल २ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना आपली गाय पुन्हा मिळाली.

पतीनिधनानंतर दुसरा आधारही हरपला, १८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खंबीर मातेचा आदर्श निर्णय
शेतकरी असलेल्या दुलाराम यांनी सांगितलं की, खूप वर्षांपूर्वी मी एक गाय पाळली होती. कालांतराने त्या गायीला वासरू झाले. आणि या वासराला गोठ्यातून काही चोर चोरी करून घेऊन गेले. या गायीला मी माझ्या मुलींसारखा जीव लावला. मला तीन मुली असून त्या तीनही मुलींची लग्नं झाली आहेत. त्यामुळे सध्या घरी मी आणि पत्नी असे दोघेच असतो. त्यामुळे गायीला आणि तिच्या वासराला आम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग मानतो. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी हे वासरू गोठ्यातून चोरून नेण्यात आले. यावेळी मला मारहाणही केली गेली असे दुलाराम यांनी सांगितले.

VIDEO | लाडक्या शिक्षकाची १४ वर्षांनी बदली, गावकऱ्यांकडून मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर

पोलिसांकडे गेलो की शिव्या देऊन हाकलायचे

दुलाराम यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार घेऊन १४ डिसेंबर २०२१ रोजी मी सरदारशहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले तसेच माझी तक्रार देखील नोंदवली नाही. दरम्यान, त्यांनी पुन्हा तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस त्यांना अपशब्द वापरून हाकलून देत, या नंतरही त्यांनी हिंमत न हारता आपल्या गायीचा शोध सुरूच ठेवला. त्याचदरम्यान दुलाराम यांच्या गावात ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एका सभेनिमित्त मुख्यमंत्री अशोक गेहलोत येणार होते. या दौऱ्यावेळी दुलाराम यांनी टॉवरवर चढत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी दुलाराम यांची भेट घेऊन गायीची डीएनए चाचणी करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाचा तपास डीएसपी ओमप्रकाश गोदरा यांच्याकडे सोपविण्यात आला.

व्हॅलेंटाईन डे नव्हे, काऊ हग डे ! गाय प्रेमींमध्ये अनोखा उत्साह

गायीच्या टेस्टनंतर उलगडा

या दरम्यान, डीएसपी ओमप्रकाश गोदरा यांच्या निर्देशानुसार दुलाराम यांच्याजवळ असलेली गाय आणि चोरी झालेले वासरू यांचे सॅम्पल डीएनए चाचणीसाठी हैदराबाद येथे पाठवले. या चाचणीचा निकाल ५ महिन्यानंतर आला त्यानंतर पोलिसांनी सरदारशहर येथील गंगाराम प्रजापत याच्याकडून वासरू ताब्यात घेतले. आता हे वासरू मोठे झाले असून या गायीला दोन वासरे आहेत. आपली गाय मिळताच दुलाराम यांना अश्रू अनावर झाले होते. जोपर्यंत गाय मिळणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही असा संकल्प दुलाराम यांनी केला होता. गाय घरी आल्याने संपूर्ण कुटुंब आंनदी असून त्यांच्या या आनंदात गावकरीही सामील झाले होते.

विलासच्या पहिल्या बायकोचं भूत आलं न् खून केला, विदर्भाला चक्रावणाऱ्या हत्येचं गूढ उकललं

[ad_2]

Related posts