Virat Kohli And Babar Azam Can Create History In IND vs PAK Match In Asia CUP 2023 ; IND vs Pak सामन्यात विराट आणि बाबर दोघांनाही इतिहास रचण्याची संधी, किती धावा हव्यात पाहा…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पल्लिकल : भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असेल. कारण या सामन्यात दोन्ही देशांतील अव्वल समजले जाणारे खेळाडू इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. कारण या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर अझम हे इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत, यासाठी त्यांना नेमक्या किती धावा हव्या आहेत हेदेखील आता समोर आले आहे.
विराट आणि बाबरला विक्रमांची संधी…
विराट कोहलीसाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल. १३ हजार वनडे धावांसाठी विराटला १०२ धावांची आवश्यकता आहे. आज हा पल्ला त्याने गाठला, तर तो सचिन तेंडुलकर यांना मागे टाकेल. कारण तसे झाल्यास विराटच्या १३ हजार वनडे धावा २६६ डावांत होतील. तर सचिनला ३२१ डावांत हा पल्ला गाठला होता. त्यामुळे या सामन्यात भारताकडून सर्वात कमी डावांत १३ हजार धावा करण्याचा विक्रम हा कोहलीच्या नावावर होणार आहे. त्यामुळे कोहली या सामन्यात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विराट कोहलीचा कडवा प्रतिस्पर्धी समजले जाते ते पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला. बाबरच्या नावावर सध्या १९ वनडे शतके आहेत. आणखी एक शतकाने त्याची सईन अन्वरच्या सर्वाधिक वनडे शतकांशी बरोबरी होईल. सध्या पाकिस्तानकडून सर्वाधिक वनडे शतके अन्वरच्या नावे आहेत. त्यामुळे या सामन्यात जर बाबरने शतक झळकावले तर त्याच्या नावावर सर्वात कमी सामन्यांमध्ये २० शतकं करण्याचा विक्रम होऊ शकतो. गेल्या सामन्यात बाबरने सर्वात कमी सामन्यांत १९ शतकं झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यामुळे आता जर या सामन्यात बाबरने शतक झळकावले तर तो एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरणार आहे. त्यामुळे हा सामना बाबरसह चाहत्यांसाठीही सर्वात महत्वाचा समजला जात आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

कोहली आणि बाबर यासारख्या दोन मोठ्या क्रिकेटपटूंसाठी हा सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता दिग्गज खेळाडू विक्रम रचतो, याकडे तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts