India Win Against Nepal By 10 Wickets And Enter Into Super 4 Of Asia Cup 2023 ; भारताचा आशिया कपमधला पहिला विजय, सुपर ४ मध्ये प्रवेश झाला की नाही जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पल्लिकल : भारताने नेपाळवर दणक्यात विजय साकारला. भारताची बिन बाद १७ अवस्था असताना जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यानंतर भारताला विजयासाठी २३ षटकांमध्ये १४५ धावांचे टार्गेट देण्यात आले होते. पावसानंतर भारताचा डाव थोडा संथ सुरु झाला होता. पण त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी धडाकेबाज फलंदाजी करत आपली अर्धशतके झळकावली. त्यामुळे यावेळी भारताला विजय मिळवता आला. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये भारताने दिमाखात प्रवेश केला आहे.

गिलने या सामन्याची चौकाराहसह जोरदार सुरुवात केली होती. गिलने सुरुवातीला चार चौकार हे ऑफ साईडला मारले. त्यानंतर मात्र गिल हा चांगला लयीत आला होता. दुसरीकडे रोहित शर्माही शातं नव्हता. गिलपेक्षा रोहित यावेळी भन्नाट फॉर्मात होता. कारण रोहित एकामागून एक धडाकेबाज फटके लगावत होता. त्यामुळे गिलच्या पूर्वीच रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. रोहित यावेळी चांगल्या फॉर्मात दिसत होता. गेल्या सामन्यात रोहितने पहिल्या षटकात चौकारासह चांगली सुरुवात केली होती. पण रोहितला पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण रोहितने ती कसर यावेळी भरून काढल्याचे पाहायला मिळाले.

हा सामना भारतासाठी महत्वाचा होता. कारण या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला असता तर त्यांचे आव्हान संपुष्टात आले असते. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला असता तर भारत सुपर ४ फेरीत दाखल झाला असता. पण रोहित शर्माचा साकारात्मक विचार यावेळी पाहायला मिळाला. कारण पाऊस पडल्यानंतरही आपल्याला खेळायचे आहे, हा रोहितचा पवित्रा कायम दिसला. त्यामुळे पाऊस पडल्यावरही त्याने जास्त घाई केली नाही आणि तो पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होता. त्यामुळे रोहितला जे पंचांनी सांगितले ते त्याने ऐकले आणि तो थेट मैदानात खेळायला आला. रोहित आणि गिल यांनी पावसानंतर काही काळ शांतपणे खेळ केला. पण त्यानंतर मात्र या दोघांनी दमदार फटकेबाजी करत आपली अर्धशतके झळकावली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारताचा हा या आशिया चषकातील पहिला विजय ठरला. कारण यापूर्वी भारताचा पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दुसरा सामान तरी पूर्ण व्हावा, अशी चाहत्यांना आशा होती. दुसरा सामना हा खेळवला गेला आणि त्यामध्ये भारताचा पहिला विजय यावेळी चाहत्यांना पाहता आला.

[ad_2]

Related posts