[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारत आणि पाकिस्तानचा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना पुन्हा समान गुण दिले जातील. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाना समान १ गुण दिला जाणार आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा संघ हा २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे जर पाकिस्तानला १ गुण मिळाला तर ते पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होणार आहेत. दुसरीकडे भारताला एक गुण मिळेल. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी ९ सप्टेंबरला श्रीलंक व बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्यांना दोन गुण मिळतील आणि ते दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. त्यामुळे भारतीय संघ एका गुणासह तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. त्यामुळे जर १० सप्टेंबरला होणारा सामना रद्द झाला तर भारतापेक्षा त्याचा फायदा पाकिस्तानाच जास्त होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ मधील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण जरी दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही तर भारत आणि पाकिस्तान यांना समान एक गुण दिला जाईल.
[ad_2]