[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange patil : मंडल कमिशनला ओबीसींची जणगणना करा असे सांगण्यात आले होते. मात्र, मंडल कमिशनने नव्यानं जणगणना केली नसल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. ओबीसींना 14 टक्के आरक्षण दिले. 4 वर्षात ते 30 टक्के झालं. चार वर्षांत 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली असा सवाल जरांगे पाटलांनी केला. ते अकलूजमध्ये आज जाहीर सभेमध्ये बोलत होते. मराठ्यांनो भानावर या. तुमचे मतभेद बाजूला ठेवा आणि आरक्षणासाठी एकत्र या. 40 वर्ष एकमेकांशी पटत नसलेले एका रात्रीत एकत्र आले आणि त्यांना लाल दिवा मिळाला असेही जरांगे पाटील म्हणाले.
1 जून 2004 मध्ये मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर पारित झाला होता. त्या जीआरमध्ये दुरुस्ती करा अशी मागणी केली आहे. पारित केलेला खोटा कायदा आम्हाला मान्य नाही असे जरांगे पाटील म्हणाले. ही सभा नाही ही लेकरांची वेदना आहे. त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही इथे एकत्र आला आहेत. पश्चिम महाराष्ट्रात लोकं एकत्र येत नाही असं लोकं म्हणतात. तुम्ही मात्र रेकॉर्ड मोडल्याचे पाटील म्हणाले.
[ad_2]