Beed Maharashtra Young Boy Sucide For Maratha Reservation Maratha Protest Manoj Jarange Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्येचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. दसऱ्याच्या दिवशी बीडमधील (Beed) एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. बीड जिल्ह्यातील शहाजानपूर तालुक्यामध्ये एका 23 वर्षीच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन त्याचं आयुष्य संपवलं. शरद मते असं या तरुणाचं नाव आहे. आयुष्य संपवण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं असा एक मजकूर त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता. दरम्यान मागील चार दिवसांमध्ये दोन तरुणांनी आयुष्य संपवलं. 

शरदने त्याच्या घरामागील शेतात जाऊन गळफास घेतला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात जोर धरत आहे. त्यातच अनेक तरुण या मुद्द्यासाठी आयुष्य संपवत असल्याच्या घटना समोर येतायत. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचं म्हटलं जातय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील या तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन केलंय. 

बीडमध्ये याआधीही तरुणाने संपवलं आयुष्य

शुक्रवार (20 ऑक्टोबर) रोजी या तरुणाने झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसऱ्या दिवशी मात्र या तरुणाने त्याचं आयुष्य संपवलच. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. 

बलिदान वाया जाऊ देणार नाही – मनोज जरांगे

दरम्यान मनोज जरांगे यांनी या तरुणांचं बलिदान वाया जाऊ न देण्याचा निर्धार केलाय. तसेच त्यांनी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेईन असा निर्धार त्यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात केलाय. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं असून त्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. 

मराठा तरुणांचं टोकाचं पाऊल

आरक्षणासाठी मराठा समाजाचे तरुण सध्या टोकाचं पाऊल घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा  विषय राज्यभर पेटला असताना आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी परभणीच्यापाथरी तालुक्यातील वडी येथे 28 वर्षे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर  हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. शैक्षणिक फी भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचा : 

Solapur News : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक, छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

[ad_2]

Related posts