ST Service In Maharashtra Gunratna Sadavarte St Workers Strike Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने  आजपासून  (6 नोव्हेंबर) संपाची हाक (ST Workers Strike) दिली आहे.  मात्र सदावर्तेंच्या आवाहनाला प्रतिसाद नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यभरातील एसटी सेवा सुरळीत सुरु आहे. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, ठाण्यातील एसटी सेवा  सुरु आहे. 

जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे,  पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार,  कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे. 

काय आहेत सदावर्तेंच्या मागण्या?

गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की,  एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला.

कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने 6 नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 250 आगारातील सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

मासिक नफ्यात एसटी महामंडळ…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती.त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 9000 कोटी रुपयांचा आतापर्यंत संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. सरकार आणि एसटी महामंडळ यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याची परिस्थिती आहे. आज घडीला एसटी महामंडळ 1990 ते आतापर्यंत एकूण 9 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात आहे. मात्र आता मासिक आणि दैनंदिन तोट्याच प्रमाण कमी झालं आहे.

येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु

 एसटीच्या सर्व (ST Mahamandal)  आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान (Maratha Reservation Protest) अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आलंय. येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे. 

हे ही वाचा :

Beed News : जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु; थेट हिमाचल प्रदेशमधून मागवल्या काचा

[ad_2]

Related posts