[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : दिपावलीनिमित्त हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाने (Mumbai High Court) आज महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील सारी बांधकामे तूर्तास बंद करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. विकासकामांपेक्षा लोकांची जीव महत्त्वाचा असून काही दिवस बांधकामे बंद राहिलं तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल हायकोर्टाने आज सुनावणी दरम्यान केला.
मुंबईतील हवा प्रदूषणाबाबत आज हायकोर्टात सुनावणी झाली. मुंबईत दिवसेंदिवस खालवत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देंवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. हायकोर्टानं या प्रकरणी जेष्ठ कायदेतज्ज्ञ दरायस खंबाटा यांना अमायकस क्युरी(कोर्टाचा मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासनानं या विषयाकडे गांभीर्यानं पाहात तातडीच्या उपाययोजना तात्काळ सुरू कराव्यात असे हायकोर्टाने आजच्या सुनावणी दरम्यान म्हटले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळेत….
[ad_2]