स्मिथ-हेड यांनी दिला डोक्याला ताप; आज या ४ गोष्टी केल्या तर ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडेल |Maharashtra Times

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: ऑस्ट्रेलियाच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायलनमध्ये पहिल्याच दिवशी ३ बाद ३२७ धावा केल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात कमबॅक करण्याचा दम आहे. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडिया जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा त्यांना थोडी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागले. जाणून घेऊयात टीम इंडिया कशी काय कमबॅक करू शकते.घरच्या मैदानावरील वाघ अशी ओळख असलेल्या ट्रेविस हेडने वनडे स्टाइलमध्ये (१५६ चेंडूत १४६ धावा) ऐतिहासिक शतकी खेळी केली. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्याच दिवशी हेड भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला. दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथने २२७ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावर स्मिथ नेहमीच घातक ठरला आहे. आता तो शतकाच्या जवळ आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८५ षटकात ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या.

WTC Final Ind v Aus: IPLमधील अपमानाचा ट्रेविस हेडने असा घेतला बदला; भारतीय गोलंदाज हतबल
सुरुवातीचे २-३ तास महत्त्वाचे

भारताने या सामन्यात ४ जलद गोलंदाजांना संधी दिली आहे. मात्र मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा मारा जितका प्रभावी ठरला, तितकेच शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव यांनी निराश केले. आज दुसऱ्या दिवशी सुरुवातीचे काही तास फार महत्त्वाचे असतील. रोहितला शमी आणि सिराज यांना आघाडीवर ठेवावे लागले आणि त्यांनी कमीत कमी २-३ विकेट घेतल्या तरच गोष्टी भारतासाठी सकारात्मक होतील.

रणनिती बदलावी लागले

पहिल्या दिवशी वेगाने चेंडू टाकण्यावरून रविंद्र जडेजा अनेकदा रोहित शर्माशी बोलताना दिसला. आज जेव्हा तो मैदानात उतरेल तेव्हा रणनिती बदलण्याची गरज लागले. ग्रीन ट्र्रॅकवर टॉस जिंकल्यानंतर गोष्टी सोप्या होतील असे वाटले होते. पण हेड आणि स्मिथ यांनी या पिचीवर जोरदार फलंदाजी केली. संघात अश्विन नाही तर जडेजा कमाल करू शकेल अशी आशा आहे. आतापर्यंत त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

वर्ल्ड कप: कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध अहमदाबादला खेळणार नाही; पाक बोर्डाने ICCला कळवले
धावा रोखणे आणि विकेट मिळवणे

जेव्हा हेड आक्रमक फलंदाजी करत होता तेव्हा शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव धावा वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले. या प्रयत्नात त्यांना विकेट मिळाली नाही आणि धावा गेल्या त्या वेगळ्याच. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना धावा रोखण्याचे नाही तर विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले नाही तर ऑस्ट्रेलिया ५०० धावा सहजपणे करेल. आणि तसे झाले तर मॅच हातातून जाऊ शकते.

आक्रमकपणा आणि फिल्डिंग

मॅचच्या पहिल्या दिवशी भारताने एकही कॅच सोडला नाही. पण अशा अनेक संधी होत्या जेथे अतिरिक्त वर्क करण्याची गरज आहे. अनेक वेळा फलंदाज चूका करत नाही, तेव्हा फिल्डर्सनी संधी निर्माण करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असते. आज दुसऱ्या दिवशी त्याची जास्त गरज आहे.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts