[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सुरुवातीचे २-३ तास महत्त्वाचे
भारताने या सामन्यात ४ जलद गोलंदाजांना संधी दिली आहे. मात्र मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा मारा जितका प्रभावी ठरला, तितकेच शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव यांनी निराश केले. आज दुसऱ्या दिवशी सुरुवातीचे काही तास फार महत्त्वाचे असतील. रोहितला शमी आणि सिराज यांना आघाडीवर ठेवावे लागले आणि त्यांनी कमीत कमी २-३ विकेट घेतल्या तरच गोष्टी भारतासाठी सकारात्मक होतील.
रणनिती बदलावी लागले
पहिल्या दिवशी वेगाने चेंडू टाकण्यावरून रविंद्र जडेजा अनेकदा रोहित शर्माशी बोलताना दिसला. आज जेव्हा तो मैदानात उतरेल तेव्हा रणनिती बदलण्याची गरज लागले. ग्रीन ट्र्रॅकवर टॉस जिंकल्यानंतर गोष्टी सोप्या होतील असे वाटले होते. पण हेड आणि स्मिथ यांनी या पिचीवर जोरदार फलंदाजी केली. संघात अश्विन नाही तर जडेजा कमाल करू शकेल अशी आशा आहे. आतापर्यंत त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.
धावा रोखणे आणि विकेट मिळवणे
जेव्हा हेड आक्रमक फलंदाजी करत होता तेव्हा शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव धावा वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले. या प्रयत्नात त्यांना विकेट मिळाली नाही आणि धावा गेल्या त्या वेगळ्याच. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना धावा रोखण्याचे नाही तर विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले नाही तर ऑस्ट्रेलिया ५०० धावा सहजपणे करेल. आणि तसे झाले तर मॅच हातातून जाऊ शकते.
आक्रमकपणा आणि फिल्डिंग
मॅचच्या पहिल्या दिवशी भारताने एकही कॅच सोडला नाही. पण अशा अनेक संधी होत्या जेथे अतिरिक्त वर्क करण्याची गरज आहे. अनेक वेळा फलंदाज चूका करत नाही, तेव्हा फिल्डर्सनी संधी निर्माण करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असते. आज दुसऱ्या दिवशी त्याची जास्त गरज आहे.
[ad_2]