Rajya Sabha Election 2024: भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार; अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अडचण, समीकरण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajya Sabha Election 2024: नवी दिल्ली : भाजप (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha) आपला चौथा उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजप प्रवेश आणि भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे काँग्रेसची (Maharashtra Congress) राज्यसभेची एक जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अनिल बाबर (Anil Babar), गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचा मृत्यू आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा, तसेच, सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी रद्द झाल्यानं सध्या काँग्रेसचं विधानसभेतील एकूण संख्याबळ 284 इतकं आहे. त्यामुळे एकूण आमदार भागीले एकूण उमेदवार अधिक एक यानुसार, 40 मतांचा कोटा होईल. त्यानुसार, भाजपला 3 जागा, शिवसेना (शिंदे गट) 1 जागा, राष्ट्रवादी (अजित दादा गट) 1 जागा आणि काँग्रेसला 1 जागा मिळताना दिसत आहे.  

काँग्रेसकडे सध्या 43 आमदार आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसचं समीकरण बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यसभेत भाजप आपला चौथा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्यानं काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

अशोक चव्हाण आणि राज्यसभेची चौथी जागा, भाजपची रणनिती काय? 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणुका होणार आहेत. संख्याबळाच्या आधारे भाजप तीन, शिवसेना एकनाथ शिंदे 1, राष्ट्रवादी अजित पवार 1 राज्यसभेची जागा जिंकू शकतात. पण भाजपनं सहावी जागाही लढवण्याचा निर्णय घेतला, तर ती जिंकण्यासाठी क्रॉस व्होटिंग होऊ शकतं. अशा परिस्थितीत काँग्रेसचे समर्थक आमदार अशोक चव्हाण क्रॉस व्होटिंग करून भाजपची राज्यसभेची जागा जिंकून देऊ शकतात. दुसरीकडे, काँग्रेस माजी राज्यपाल रघुराम राजन यांना महाविकास आघाडी संयुक्त राज्यसभेचे उमेदवार म्हणून उभं करू शकते. 

अशोक चव्हाण भाजपसाठी कसे महत्त्वाचे ठरणार? 

2019 च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात भाजपला सत्तेवरून बेदखल केलं आणि बहुमत मिळूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्या दोन वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटसवर काम सुरू केलं. शिवसेनेचं पहिलं बंड एकनाथ शिंदे, नंतर अजित पवारांचं राष्ट्रवादी आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधातील बंड. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणूक आली, तेव्हा काँग्रेसमध्येही फूट पडली. अशोक चव्हाण हेही आपल्या जवळचे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, माजी आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. एक मोठा मराठा चेहराही भाजपमध्ये येणार असून विदर्भात पक्षाला बळ मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, भाजपची साथ देणार? महाराष्ट्राच्या राजकारणाची Inside Story

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts