[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra News LIVE Updates: भंडारा जिल्ह्यात 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी वादळी पावसासह गारपिटीचा जबर तडाखा बसला. मोठ्या प्रमाणात कौलारू घरांचं नुकसान झालं. तसेच शेतशिवारातील रब्बी पिकांसह भाजीपाला व बागायती पिकांचीही हानी झाली. अवकाळीमुळं भंडारा जिल्ह्यातील 142 गावं बाधित होऊन जवळपास 5 हजार 689 शेतकऱ्यांच्या 2 हजार 649 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं वर्तविला आहे. नुकसानग्रस्त पिकांमध्ये मका, गहू, हरभरा, जवस, वाटाणा, भाजीपाला, लाख, लाखोरी आदी पिकांचा समावेश आहे. सर्वेक्षणाचं काम वेगानं सुरू असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
[ad_2]