‘शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या..’, ‘त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचीही तयारी’; ठाकरेंचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Protest Against Modi Government: पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देत आजपासून दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “पंजाबचा शेतकरी दिल्लीकडे निघाला आहे. त्यास दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचू दिले जाईल काय? हाच खरा प्रश्न आहे,” असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. “ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी आहे तो शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्याच्या ‘माला’वर मालामाल अशी परिस्थिती आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाशी काहीच घेणेदेणे नाही…

Read More