[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या या दारूण पराभवानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संपूर्ण भारतीय संघावर मोठी कारवाई करत दंड केला आहे. आयसीसीने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाने फायनल मॅचमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केली त्यामुळे संपूर्ण संघाची पूर्ण मॅच फी इतका दंड करण्यात आला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी निर्धारित केलेल्या लक्ष्या पेक्षा पाच ओव्हर कमी टाकल्या ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
आयसीसीने फक्त भारतावरच नाही तर नवे टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर देखील धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित केलेल्या लक्ष्या पेक्षा ४ ओव्हर कमी टाकल्या. ऑस्ट्रेलिया संघाला ८० टक्के इतका दंड केला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी चूक मान्य केल्याने याबाबत कोणतीही सुनावणी झाली नाही.
शुभमन गिलला मोठा दंड
भारतीय संघावर झालेल्या कारवाई सोबत सलामीवीर शुभमन गिलवर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल गिलवर १५ टक्के इतका दंड करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा एकूण दंड ११५ टक्के इतका झाला आहे. भारताच्या दुसऱ्या डावात गिलला वादग्रस्त पद्धतीने बाद दिले होते. कॅमरून ग्रीनने स्पिलमध्ये त्याचा कॅच घेतला होता. तिसऱ्या अंपायरने तो कॅच योग्य ठरवले आणि गिलला बाद दिले. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गिलने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. या दंडासह गिलला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
गिलने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसीच्या आचार संहिता कलम २.७चे उल्लंखन केले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये होणाऱ्या घटनेवर सार्वजनिक टीका करण्यासंबंधीचा आहे.
[ad_2]