[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
व्याधीजन्य जीवनशैलीचा फटका
या अभ्यासातील निष्कर्ष हे अत्यंत खराब जीवनशैली व आहारशैलीचे द्योतक आहेत, असे सांगताना मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. मयुरा काळे म्हणाल्या, ‘मुळात व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे आणि योग्य व अपेक्षित पद्धतीने व्यायाम करणारे आणखी कमी आहेत. त्याशिवाय शारीरिक हालचालही खूप कमी झाली आहे. एकाच जागी बसून राहणे, गॅजेझटसला चिकटून राहणे, हा प्रकार खूप जास्त वाढत आहे आणि हे लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्रास दिसून येत आहे. पुन्हा फास्ट फुड, जंक फुडचा अतिरेकही दिसून येत आहे.’
२५ ‘बीएमएम’पुढे स्थूलत्व
‘पाश्चात्य देशांमध्ये ३० ‘बीएमआय’च्या पुढे स्थुलत्व मानण्यात येते; परंतु भारतीयांमध्ये २५ ‘बीएमआय’च्या पुढे स्थुलत्व मानण्यात येते. मुळात अनेक भारतीयांचा सर्वसाधारण ‘बीएमआय’ मर्यादेत असतो; परंतु पोटाचा घेर खूप जास्त असतो. हात-पाय बारीक व पोटाचा घेर जास्त, असे व्यक्तिमत्व सर्रास पाहायला मिळते. त्यामुळेच २५ पेक्षा जास्त ‘बीएमआय’ हा भारतीयांच्या बाबतीत स्थुलत्व मानण्यात येत आहे,’ असेही डॉ. मयुरा काळे म्हणाले.
स्थूलत्व हेच मुख्य कारण
खरे म्हणजे बहुतांश असांसर्गिक आजारांसाठी वाढलेले वजन व स्थुलत्व कारणीभूत ठरत आहे. एकीकडे शारीरिक हालचाल, व्यायामाचे प्रमाण अत्यल्प झालेले असताना, दुसरीकडे अनारोग्य पद्धतीची आहारशैली खूप जास्त प्रमाणात वाढली आहे.
याच अभ्यासात ८१ टक्के व्यक्तींमध्ये लिपिड पातळी वाढलेली आढळून आली आहे. साहजिकच कोलेस्टेरॉल व इतर त्रासदायक घटक खूप जास्त प्रमाणात वाढून हृदयरोगांचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे जीवनशैली व आहारशैली बदलण्याशिवाय पर्याय नाही, हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे.- डॉ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ
प्रत्येकाचा सरासरी स्क्रीन टाइम ४ ते ५ तास होत आहे. त्यामुळे एकाच जागी बसून राहण्याचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. खरे म्हणजे सध्या उन्हाळी सुट्या सुरू आहे, पण किती मुले मैदानावर खेळत आहे, हे लक्षात घेतले तर परिस्थिती स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही.-डॉ. अनंत कुलकर्णी, फिजिशियन
[ad_2]