Maha Shivaratri 2024 Poisoning by eating bhagar What care should be taken eating bhagar marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahashiv Ratri 2024 : आज महाशिवरात्र असून,उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे (Bhagar) सेवन केले जाते. मात्र,मागील काही दिवसांपासून भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात (Maharashtra) सतत समोर येत आहेत. नांदेड (Nanded) जिल्ह्यात कालच एकाचवेळी 10 ते 12 गावातील नागरिकांना भगर खाल्यानंतर विषबाधा झाली. तसेच नांदेडच्या परळीत देखील भगर खाल्याने अनेकांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. त्यामुळे आता याबाबत प्रशासनाकडून भगर खाण्याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस (Aspergillus) प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) यासारखी विषद्रव्ये (Toxins) तयार होतात. ऑक्टोबर महीन्यातील तापमान आणि आर्द्रता बूरशीच्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत.

भगर खाताना काय काळजी घ्यावी

  • बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.
  • भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.
  • शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.
  • भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.
  • भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे.

भगर विक्रेत्यांसाठी सुचना

  • विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.
  • भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या.
  • मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये.
  • सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.
  • अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल.

एकाचवेळी 10 ते 12 गावातील नागरिकांना विषबाधा…

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दहा ते बारा गावातील नागरिकांना भगरातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी समोर आली.  ज्यात अंदाजे 60 ते 70 जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर पुढील उपचार उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे चालू होते. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी सर्वांची प्रकृती चांगली असून, त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याची माहिती दिली आहे. सध्या एकादशी व महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने उपवास धरत असतात, त्यामध्ये भगर हा उपवासाचा पदार्थ खातात. त्यामुळे काल एकादशीनिमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्याचे सेवन केले होते. याच भगरमधून विषबाधा होऊन त्यांना मळमळ, उलट्या होत असल्याने त्यांनी त्वरित हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Mahashiv Ratri 2024: थांबा! महाशिवरात्रीला पुजेच्या ताटत चुकूनही ठेवू नका ‘हे’ फूल, प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतील महादेव

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts