Farooq Abdullah : ‘ईव्हीएम मशीन चोर, आमचं सरकार आल्यावर ईव्हीएम हटवणार’, शिवाजी पार्कातून फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Farooq Abdullah speech Shivaji Park Mumbai : मणिपूर येथून निघालेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) समारोप होत आहे. या निमित्त देशातील इंडिया आघाडीचे अनेक बडे नेते जाहीर सभेसाठी उपस्थित आहेत. या सभेत संबोधित करताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांनी (Farooq Abdullah) मोठी घोषणा केली आहे. 

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून (India Alliance) पहिलीच सभा मुंबईत पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीकडून शिवाजी पार्कमधून फुंकण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एम. के. स्टालिन आणि फारुख अब्दुला यांच्या भाषणाने सभेला सुरुवात करण्यात आली.

फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा 

यावेळी फारूक अब्दुल्ला म्हणाले की, हिंदू, मुस्लीम, शिख असेल देशातील सर्वजण भारतीय आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान बंद होईल. त्याशिवाय निवडणूक आयोग पूर्णपणे मुक्त होईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. आपल्यापुढे खूप सारी आव्हानं आहेत, त्याचा सामना आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सर्वजण येथे आज जमले आहेत. गॅस, पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण निवडणुका आल्यामुळे आता किंमत कमी करण्यात आली आहे. मात्र महागाई प्रचंड वाढली आहे. गरिबी वाचवण्याबद्दल बोलत होते, पण खरेच गरीबी संपली का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Rahul Gandhi Live Updates : राहुल गांधींच्या शेजारी उद्धव ठाकरे, मंचावर शरद पवार आणि मेहबुबा मुफ्तींसह दिग्गज नेते उपस्थित

शिवतीर्थावर पोहोचताच राहुल गांधींकडून छत्रपती शिवराय, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts