Ambati Rayudu Made A Shocking Allegation On BCCI President ; BCCI अध्यक्षांनी का केला माझा गेम, अंबाती रायुडूने धक्कादायक आरोप करत कारण सांगितलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : अंबाती रायुडू आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यानंतर आता त्याने बीसीसीआयच्या अध्यक्षांवर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे आता भारताच्या क्रिकेट वर्तुळात या गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.अंबाती रायुडूवर अन्याय झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण तो अन्याय कसा झाला हे आता समोर आले आहे. २०१९ साली भारताचा संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला जाणार होता. या संघात रायुडूला संधी मिळेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण निवड समितीने रायुडूला संधी दिली नाही तर त्यांना त्याच्या जागी विजय शंकरची निवड केली. त्यामुळे रायुडू चांगलाच भडकला होता आणि त्याने निवड समितीवर जोरदार टीका केली होती. पण ही काही अन्यायाची रायुडूच्या बाबतीत पहिलीच गोष्ट नव्हती. यापूर्वी तो जैव्हा हैदराबादच्या संघाकडून खेळत होता तेव्हा त्याच्यावर अन्याय झाला होता. या सर्व गोष्टींबाबत रायुडूने आता धक्कादायक आरोप केले आहेत.

रायुडू म्हणाला की, ” बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्यामुळे मला भारतीय संघात जास्त काळ खेळता आले नाही. शिवलाल यांना त्यांच्या मुलाला भारतीय संघाकडून खेळवायचे होते. त्यासाठी त्यांनी मला त्रास देणे सुरु केले होते. जे खेळाडू माझ्याबरोबर बोलायचे त्यांनाही शिवलाल यादव यांनी त्रास दिला होता. काही करून संघात मला एकाकी पाडायचे, हा त्यांचा डाव होता. माझी कामगिरी ढासळली तर त्यांना अर्जुनला पुढे पाठवता येऊ शकत होते. त्यासाठी माझे पाय खेचणे हैदराबादच्या संघात ुसुर होते. काही काळ ही गोष्ट मी सहन केली. पण पाणी डोक्यावर गेल्यावर मात्र मी हैदाराबादचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला.”

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

विश्वचषकात निवड न झाल्यााबाबत रायुडू म्हणाला की, ” इंग्लंडमधील विश्वचषकासाठी मला तयारी करण्यासाठी सांगण्यात आले होते. भारतीय संघातील माझे स्थान जवळपास निश्चित होते. पण संघ निवडताना मात्र माझी निवड करण्यात आली नाही. माझ्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते.”

[ad_2]

Related posts