Manipur Fresh Violence Late Nigh Firing 9 Killed; मणिपूरमधील धग कायम, समाजकटकांचा मध्यरात्री गोळीबार, ९ जणांचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, इम्फाळ : जातीय संघर्ष उफाळून आलेल्या मणिपूरच्या खामेनलोक भागातील एका गावावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात किमान नऊ जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.

पूर्व इम्फाळ जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवरील या भागातील कुकी गावाला सशस्त्र समाजकंटकांनी वेढा घातला आणि मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. गोळीबारात दोन्ही गटांमध्ये जीवितहानी झाली. या दरम्यान, पूर्व इम्फाळ आणि पश्चिम इम्फाळ जिल्हा प्रशासनांनी संचारबंदीमधील शिथिलतेचा कालावधी कमी केला. तो पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेऐवजी पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत केला आहे.

मणिपूरच्या १६ पैकी ११ जिल्ह्यांत संचारबंदी लागू आहे. संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये महिनाभरापूर्वी मैतेई आणि कुकी समुदायात उसळलेल्या जातीय हिंसाचारात १००हून अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे, तर ३१० जण जखमी झाले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
धक्कादायक! प्रथम मैत्री केली, नंतर घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेत केला अत्याचार;अश्लील फोटोही काढले

काँग्रेसची टीका

मणिपूरमध्ये माणुसकीचा आवाज संपत असताना सरकार निर्लज्जपणे स्वत:चे ढोल बडवित आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी का मौन धारण करून आहेत, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

‘भारताचे सुंदर सीमावर्ती राज्य जळत असताना मोदीजी त्याकडे पाहायला तयार नाहीत. समाजकंटकांनी पाच लाख दारुगोळा आणि चार हजार ५७३ शस्त्रे पोलिस शस्त्रागारातून लुटली आहेत. शेकडो प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आसाम रायफलच्या जवान अडकले आहेत आणि त्यांना लष्कराकडून हेलिकॉप्टरमधून धान्यपुरवठा होत आहे, हे विचार करण्यापलिकडचे आहे,’ असे ट्वीट खर्गे यांनी केले आहे.
विशाळगडावरील ‘त्या’ प्रथेवरील बंदीला आव्हान, आज उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरचा दौरा देखील केला होता. मणिपूरच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही तेथील संघर्षाची धग कायम आहे. धगधगतं मणिपूर कधी शांत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या एका मंत्र्याचं घर देखील जाळण्यात आलं आहे.

ज्यांना विखेंच्या विरोधात लोकसभा द्यायची, त्यांचाच राष्ट्रवादीला रामराम, KCR यांच्या गळाला मोठा मासा

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

[ad_2]

Related posts