Maharashtra Politics Shiv Sena Thackeray Faction MLC Manisha Kaynde Joined Shiv Sena Eknath Shinde Faction Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiv Sena Manisha Kaynde:  शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अखेर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आज शिबिरात असलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली. 

शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीत शिबीर पार पडले. मात्र, त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे ह्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्या शिंदे गटात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे.  येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी म्हटले की, माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे यांच्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल का झाला आत्ताच का झाला? हा सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामातून त्यांना उत्तर दिलं असल्याची कायंदे यांनी म्हटले. बाळासाहेबांचे शिवसेना इथे आहे म्हणून मी इथे आहे. कोणी तरी सांगितलं कचरा निघून जात आहे.  कचरातून ऊर्जा निर्मिती होते  असं म्हणत कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मै भी कुछ नही करूंगा ,,,किसी को कुछ नहीं करने दूंगा असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोविड काळामध्ये जनतेला कोण भेटत होतं, हे जनतेला माहीत आहे. नुसतं फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाइनच्या माध्यमातून माणसं वाचत नसतात. अडीच वर्षे मध्ये त्या सरकारने काय काम केलं आणि अकरा महिन्याचे सरकार काय काम केलं हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सर्व काम अडीच वर्षामध्ये बंद केले अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यांच्याकडे एकच कॅसेट वाजत असते. आता त्यांना स्क्रिप रायटर बदलला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला. नवीन विचार आमच्याकडे आहे. ते आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊन अकरा महिना मध्ये काम करून दाखवलं आहे. उद्या वर्धापन दिनाच्या दिवशी अधिक बोलणार असल्याचे सूचक वक्तव्यही मुख्यमंत्री शिेदे यांनी केले. 

[ad_2]

Related posts