[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पीसीबीने आता वर्ल्डकपसाठीचे नवे नाटक सुरु केले आहे. आता पाकिस्तानचा संघ एका सुरक्षा पथक भारतात पाठवणार आहे. जिथे जिथे पाकिस्तानचे सामने होणार आहेत तिथे हे सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक पाहणी करेल. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी खेळणार आहे.
पीसीबीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, “बोर्डाला सामन्यांच्या ठिकाणांसह भारताच्या कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारची परवानगी आवश्यक आहे. आम्ही मार्गदर्शनासाठी आमच्या सरकारशी संपर्क साधत आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळताच ICC लाअपडेट करू.”
याशिवाय ज्या ठिकाणी पाकिस्तान क्रिकेट संघाचे सामने होणार आहेत, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी PCB आपले सुरक्षा पथक पाठवण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही आणि ती सरकारच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. काही संघांनी मोठ्या कार्यक्रमांपूर्वी असे सुरक्षा मूल्यमापन करणे हा एक सराव आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा पथकाच्या अहवालामुळे भारताविरुद्धचा २०१६ चा टी-२० वर्ल्डकप सामना धर्मशाला येथून कोलकात्यात खेळवावा लागला होता.
[ad_2]