[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बीसीसीआमधील सचिवपद हे सर्वात मोठे समजले जाते. एकतर बीसीसीआय ही क्रिकेट विश्वातील सर्वात धनाढ्य संघटना आहे. बीसीसीआयमधील सर्व निर्णय घेण्याची क्षमता ही सचिवांमध्ये असते. त्यामुळे हे सर्वात वजनदार पद असल्याचे म्हटले जाते. जय शहा यांनी गेल्या काही काळत हे पद सांभाळले असून त्यांची ही दुसरी टर्म सुरु आहे. पण ही टर्म पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना सचिवपद सोडावे लागणार, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या पदावर भाजपामधीलच एक खेळाडू विराजमान होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या पदावर नेमकी कोणती व्यक्ती येणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
जय शहा यांनी जर लवकर बीसीसीआयचे सचिवपद सोडले तर त्यासाठी भारताच्या दोन्ही विश्वविजेत्या संघातील महत्वाचा खेळाडू ठरलेला गौतम गंभीर हा सर्वात योग्य उमेदवार आहे, असे म्हटले जात आहे. गंभीरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तर चांगलाच अनुभव आहे. दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा या गंभीरच्या नावावर होत्या. त्याचबरोबर तो बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने कर्णधारपदही भूषवले आहे. आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स संघाच्या मार्गदर्शकपदी गंभीरची निवड करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी गंभीरने एक वक्तव्य केले होते आणि त्यामुळे तो चर्चेत आला होता. गंभीर म्हणाला होता की, ” संघापेक्षा खेळाडू हा कधीच मोठा नसावा, पण भारतीय संघात मात्र खेळाडूंचेच ब्रँड मोठे आहेत.”
गंभीरकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे आणि तो राजकारणातही सक्रीय आहे. त्यामुळे त्याला प्रशासनाचाही अनुभव आहे. त्यामुळे जय शहा यांनी जर बीसीसीआयचे सचिवपद सोडले तर त्यासाठी गंभीर हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे समोर येत आहे.
[ad_2]