भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आखला मोठा डाव; अचानक घेतला नेतृत्वबदलाचा निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. तेलंगणात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, पंजाबमध्ये सुनील जाखड, आंध्र प्रदेशातील डी. पुरंदेश्वरी आणि झारखंडमधील बाबूलाल मरांडी यांच्याकडे त्या त्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यातील रेड्डी वगळता इतर तिघेही अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश घेतलेले नेते आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्रात गृहराज्यमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे जी किशन रेड्डी यांची तेलंगणच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेशात, माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांची झारखंडमध्ये, तर पंजाबचे दिग्गज नेते सुनील जाखड यांची त्या राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तलवार अन् वाघनखांची प्रतिकृती, उदयराजे भोसलेंकडून उपमुख्यमंत्र्यांना शिवकालीन भेट

रेड्डी यांनी अलीकडच्या काळात के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस सरकारच्या विरोधात जोरदार आवाज उठवला आहे. तेलंगणमध्ये काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी रेड्डी यांच्यावर त्यांचा कस पाहणारी जबाबदारी भाजप नेतृत्वाने टाकली आहे. बाबुलाल मरांडी हे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला. झारखंडमध्ये लोकसभेच्या १४पैकी एनडीए आघाडीकडे १२ जागा आहेत. काँग्रेसचे दीर्घकाळ प्रदेशाध्यक्षपद सांभाळणारे जाखड यांनी नवज्योत सिद्धू यांच्याबरोबरच्या वादानंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशाची सूत्रे दिलेल्या डी. पुरंदेश्वरी या मूळच्या तेलगू देसमच्या वजनदार नेत्या आहेत. तेलगू देसमचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या त्या कन्या आहेत.

शरद पवार यांचा वरदहस्त असेपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

[ad_2]

Related posts