Yashasvi Jaiswal Got Emotional After Scoring Century In Test Debut of WI vs IND Watch Video; तो आला, तो खेळला; त्याने जिंकून घेतलं सारं! डेब्यू सामन्यात शतकी खेळीनंतर यशस्वी भावुक; पाहा VIDEO

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉमिनिका: कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण असावे ते यशस्वी जयस्वालसारखे. भारताच्या कसोटी संघातील यशस्वीचे पदार्पण अगदी स्वप्नवत होते. पण यामागे त्याची बऱ्याच काळाची मेहनत, सातत्य आणि सराव याला श्रेय जाते. यशस्वीने पहिल्याच सामन्यात आपली अशी छाप पाडली आहे की अनेक काळ सर्वच जण हे लक्षात ठेवतील. विंडसर, डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात यशस्वीला वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली, ती या डावखुऱ्या फलंदाजाने चांगलीच पार पाडली. पहिल्याच सामन्यात यशस्वीने शतक झळकावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १४३ धावा करून यशस्वी नाबाद परतला. ही खेळी खेळल्यानंतर यशस्वी भावूक झाला.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यजमान संघाचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा संघ १५० धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दोन गडी गमावून ३१२ धावा केल्या आहेत.

‘स्वतःचा अभिमान’

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीने सांगितले की, ही खेळी त्याच्यासाठी खूप भावूक करणारी होती.तो म्हणाला की तो मैदानात मोकळेपणाने खेळण्यासाठी गेला होता ज्यात तो यशस्वी झाला. शतक ठोकणे हा त्याच्यासाठी भावनिक क्षण आहे ज्याचा त्याला अभिमान आहे. ही फक्त सुरुवात असून पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी तयार असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, भारतीय संघात संधी मिळणे खूप कठीण आहे. इथपर्यंतच्या प्रवासासाठी त्याने कर्णधार रोहित शर्मा, भारतीय संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले.


‘फलंदाजी करणे कठीण होते’

यशस्वी म्हणाला की, “या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते कारण खेळपट्टी अतिशय संथ आहे आणि आऊटफील्ड देखील संथ आहे आणि हवामान देखील खूप गरम आहे. त्याला आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे, असं तो म्हणाला. एकावेळी एक चेंडू खेळण्यावर आपले लक्ष असल्याचे त्याने सांगितले. यशस्वीने सांगितले की, त्याला कसोटी क्रिकेट आवडते, त्याला या फॉरमॅटमधील आव्हाने आवडतात, जेव्हा चेंडू स्विंग होतो आणि सीम होतो ते या फलंदाजाला आवडते.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

‘यशस्वी’ विक्रम!

यशस्वीने या खेळीतून अनेक विक्रम केले. यशस्वीची ही धावसंख्या भारताबाहेर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध १३३ धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी भारताचा तिसरा सलामीवीर ठरला आहे.त्याच्या आधी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी हे काम केले होते. यशस्वीने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. आशियाबाहेर भारताकडून ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.



[ad_2]

Related posts