[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शुक्रवारी काही ठिकाणी हलक्या पावस पडण्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई उपनगरांच्या तुलनेत गुरुवारी शहरात पावसाचा जोर अधिक होता. बुधवारी सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 या 24 तासांत कुलाबा केंद्रात सरासरी 223.2 मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात मुंबई उपनगरांत 145.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे विविध शहरांमध्ये पाणी साचलं असून पूरसदृश परिस्थिती आणि भूस्खलन होत आहे. त्यामुळे, राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांना तत्पर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 13 टीम यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
[ad_2]