India All Out West Indies In Just114 Run In 1st ODI, Kuldeep Yadav Took 4 Wickets ; भारताने उडवला वेस्ट इंडिजचा खुर्दा, फिरकीच्या तालावर यजमानांची उडाली भिंगरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बार्बाडोस : पहिल्याच वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजची फिरकीच्या तालावर चांगली भिंगरी उडवली आहे. भारतीय संघात पुरनागमन करताना कुलदीप यावेळी यावेळी फक्त सहा धावांत चार बळी मिळवले, तर रवींद्र जडेजाने त्याला तीन विकेट्स घेत सुयोग्य साथ दिली. त्यामुळेच भारताला वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ११४ धावांत आटोपता आला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय किती योग्य होता हे भारताच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. हार्दिक पंड्याने भारताच्या डावाची सुरुवात केली आणि त्यानेच भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने भारताला अजून एक यश मिळवून दिले. त्यानंतर कुलदीप आणि जडेजा यांनी हा सामना गाजवला.

कुलदीपची गोलंदाजी यावेळी नेत्रदीपक अशीच होती. चेंडूचा टप्पा कसा असावा आणि दिशा कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ त्याने दाखवून दिला. त्याचबरोबर वनडे विश्वाचषकाच्या संघात आपण कसे चपखल बसतो, हे त्याने यावेळी दाखवून दिले. कारण कुलदीपने यावेळी ३ षटके टाकली. या ३ षटकांमध्ये त्याच्या दोन ओव्हर्स निर्धाव होत्या. कुलदीपने उर्वरीत चार षटकांमध्ये फक्त सहा धावा दिल्या. कुलदीपने यावेळी या ६ धावांत ४ बळी बाद करण्याची किमया साधली. त्यामुळे या दमदार कामगिरीच्या जोरावर कुलदीपने वनडे वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

कुलदीपला यावेळी जडेलाने सुयोग्य साथ दिली. जडेजाने यावेळी ६ षटके टाकली, या ६ षटकांत त्याने ३७ धावा दिल्या आणि तीन बळी मिळवले. हा सामना बार्बाडोसच्या किंग्सटन ओव्हलवर होत आहे. या मैदानात आतापर्यंत ४९ वनडे सामने झाले आहेत. या ४९ सामन्यांपैकी सर्वाधिक २५ सामने हे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे रोहित शर्माने टॉस जिंकल्यावर जो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य होता हे आता समोर आले आहे.

[ad_2]

Related posts