KL Rahul and Shreyas Iyer Unlikely To Be Fit For Asia Cup 2023 Know Details; आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला दुहेरी धक्का! भारताचे २ मुख्य खेळाडू संघाबाहेरच…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आशिया चषक २०२३ साठी संघाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आशिया कप भारताला खेळायचा आहे. पण या आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला दुहेरी झटका बसणार आहे. कारण भारताचे दोन मुख्य खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. भारताचे बरेचसे खेळाडू सध्या दुखापतीतून जात आहेत.

आशिया कपसाठी जाहीर होणाऱ्या संघात भारताचे धाकड फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना या स्थान मिळण्याची अपेक्षा नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी सूचित केले आहे की हे दोन्ही फलंदाज ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या मेगा टूर्नामेंटसाठी आवश्यक तितके फिट नाहीत. त्यामुळे या संघात दोघांचीही निवड होणार नाही. हे दोघेही खेळाडू बऱ्याच काळापासून संघापासून लांब आहेत पण आशिया चषकातून ते संघात पुनरागमन करतील असे म्हटले जात होते पण दुखापतीमुळे हे दोघेही या स्पर्धेला मुकणार आहेत.

राहुल आणि अय्यर यांच्या अनुपस्थितीचा अर्थ असा आहे की वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील बहुतेक खेळाडू आशिया चषक स्पर्धेत सहभागी होतील, असा अहवाल क्रिकबझने दिला आहे. मात्र मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनामुळे गोलंदाजीत काही बदल होतील.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

प्रदीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन करणारा प्रसिद्ध कृष्णाही संघात परतला आहे पण त्याला संघात स्थान मिळणे थोडे अवघड असेल. इशान किशन आशिया चषकातही आपले स्थान पक्के करत असल्याचे दिसत आहे. यष्टीरक्षक स्थानासाठी विश्वचषकात केएल राहुल देखील संभाव्य दावेदार असू शकतो.

इशानच्या समावेशामुळे, रोहित शर्माचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाला सलामीच्या संयोजनाचा निर्णय घ्यावा लागेल. इशान आणि रोहित डावाची सुरुवात करतील तर शुभमन गिल, ज्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामी दिली आहे, तो मधल्या फळीकडे वळू शकतो. २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान बेंगळुरू येथे होणार्‍या आशिया कप तयारी शिबिरात अंतिम संघ संयोजन आणि फलंदाजीचा क्रम निश्चित केला जाईल. आशिया चषकात भारताचा सलामीचा सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे.

[ad_2]

Related posts