भारताच्या वर्ल्डकप संघाच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या युवराजला सेहवागचे कडकडीत उत्तर; थेट भविष्यच सांगितले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतात जेव्हा गेल्यावेळी वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या अंतिम मॅचमध्ये भारताने श्रीलंकेवर विजय मिळवत २८ वर्षानंतर विजेतेपद मिळवले होते. १२ वर्षापूर्वी वानखेडे मैदानावर झालेली ती मॅच सर्वांच्या लक्षात आहे. त्यानंतर भारताला एकदाही विश्वविजेतेपद मिळवता आले नाही. गेल्या एक दशकापासून आयसीसीच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाची असेल. आता संघ जाहीर झाल्यानंतर हा प्रश्न विचारला जात आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात ही क्षमता आहे का

भारताचा माजी स्टार ऑलराउंडर आणि २०११च्या विजयाचा सूत्रधार युवराज सिंग याने भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आपल्याला २०२३च्या वर्ल्डकपमध्ये २०११ सारखी कामगिरी करायची आहे. पण २०११ मध्ये भारत दबाव असताना चमकला होता. २०२३ मध्ये संघ पुन्हा दबाव असताना कामगिरी करू शकतो का? आपल्याकडे यासाठी पर्याय आहेत का? आपण दबावाचा वापर गेम चेंजर म्हणून करू शकतो का?

भारत विरुद्ध इंडिया वादात सुनील गावस्करांची उडी; म्हणाले, चांगली गोष्ट, मात्र बदल केला तर तो….
युवराजने उपस्थित केलेल्या या प्रश्नावर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागकडून तातडीने उत्तर मिळाले. सेहवाग २००७च्या टी-२० आणि २०११च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघात होता. युवीला उत्तर देताना सेहवाग म्हणतो, रोहित, विराट, शुभमन, हार्दिक आणि जसप्रीत सारखे खेळाडू दबावात कधीच झुकणार नाही. उटल ते प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देतील. आता गोष्ट राहिली ती प्रेशरची तर आपण प्रेशर घेणार नाही तर देणार, एखाद्या विजेत्या सारखे.

इतक नाही तर सेहवागने युवीला उत्तर देताना आणखी एका गोष्टीची आठवण करून दिली. गेले ३ वनडे वर्ल्डकप यजमान देशाने जिंकले आहेत. २०११ साली भारत, २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि २०१९ मध्ये इंग्लंड विजेतेपद मिळवले होते. गेल्या १२ वर्षाचा इतिहास यजमान देशाच्या बाजूने आहे. २०११ साली भारताने, १५ मध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियात तर २०१९ मध्ये इंग्लंडने घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवले होते. आता २०२३ मध्ये आपण धमाका करणार असे, असे सेहवागने म्हटले.

[ad_2]

Related posts