[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी उगारलेल्या उपोषणास्त्राचं आजचा १३वा दिवस. आतातर जरांगे यांनी पाणी आणि औषधदेखील न घेण्याचा निर्धार केलाय. काल सरकारचा प्रस्ताव अमान्य करत त्यांनी उपोषणावर राहण्याचा निर्धार केला. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखल देत आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलीय. सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं पण कुणबी प्रमाणपत्रासाठी वंशावळीची अट टाकली. त्यामुळे जरांगे उपोषणावर कायम राहिलेत. जरांगे यांनी २९ ऑगस्टला त्यांनी उपोषण सुरू केलं आणि १ सप्टेंबरला आंदोलकांवर लाठीमार झाला. त्यानंतर अंतरवाली सराटी या जालन्यातील छोट्या गावातील आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं. </p>
[ad_2]
Manoj Jarange Maratha Reservation : सरकारशी चर्चा फिसकटली, आजपासून निर्जळी आंदोलन आणखी तीव्र होणार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/d5c23a95bc7999f4724c0e719ffb95f91694329267624718_original.jpg)