Mumbai Pune Expressway One Hour Block Again Today On Khalapur Toll Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : जर तुम्ही मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन  (Mumbai – Pune Expressway)  तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी एक तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (16 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 1 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आले आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत आडोशी बोगदाजवळ  km 40/100 व km 40/900 या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना दुपारी तासभर पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. फक्त कारसाठी खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंटवरून द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत.  गेल्या आठवड्यात देखील दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु काम वेळेत पूर्ण झाल्याने अर्ध्या तासातच काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

ITMC प्रकल्प राबवण्यात येणार…

अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

ITMC सिस्टिम काय आहे?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. वाहनं टेक्नॉलॉजीशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएससारखे सेन्सर लावले जातील. ब्लुटूथ आणि वाय-फायचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल. अशावेळी द्रुतगती मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहोचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात. अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याचीही कल्पना सेन्सरमुळे मिळेल. अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल आणि तातडीची मदतही पोहोचेल.

[ad_2]

Related posts