Pune Air Quality Worse Than Mumbai Delhi Index Of Air Quality 161 Air Pollution Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Air Quality Updates: राज्याच्या राजधानीचं शहर असलेल्या मुंबईतील (Mumbai News) प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाढतं हवा प्रदूषण (Mumbai Air Pollution) सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आता मुंबई पाठोपाठ राज्याचं सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याच्याही (Pune News) हवा बिघडली आहे. चांगल्या वातावरणासाठी ओळखलं जाणारं पुणे शहर आता हवेच्या गुणवत्तेबाबत दिल्ली (Delhi) आणि मुंबईच्या पंगतीत जाऊन बसलं आहे. पुण्यानं दिल्ली आणि मुंबईलाही हवेच्या गुणवत्ता बाबत मागे टाकलं आहे. मुंबई आणि दिल्ली पेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळत आहे. 

पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 161 वर असून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 145 वर आहे. पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगर परिसरातील एक्यूआय वाईट श्रेणीत असून हवा गुणवत्ता पातळी 271 वर तर भुमकर चौकातील एक्यूआय 260 वर आहे. पुण्यातील पाषाण आणि कात्रजचा परिसर सोडता सर्वत्र हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीत आहेत. तसेच, हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थितीत असल्याचे अनेक संस्थांचा अभ्यासातून बघायला मिळत आहे.            

मुंबईतील चेंबूर परिसर ‘गॅस चेंबर’            

मुंबईतील चेंबूर परिसर तर गॅस चेंबरच झाला आहे. हवा गुणवत्ता पातळी अतिशय वाईट श्रेणीत दाखल झाली आहे. चेंबूर परिसरातील एक्यूआय 304 वर आहे. तर बदलापुरातील एक्यूआय 243, बेलापूर 138, नवी मुंबईतील एक्यूआय 261 तर उल्हासनगर 269 वर आहे. सोबतच, राज्यातील काही शहरांमध्ये देखील एक्यूआय वाईट श्रेणीत आहे. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाकडून देखील मार्गदर्शक तत्व जारी करत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.     

दरम्यान, मुंबईसह पुण्याच्या हवेची गुणवत्ता देखील खालावत चालली आहे. पर्यावरणाशी निगडित अनेक कायदे असूनही त्यांचं पालन केलं जात नाही. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सुरू असलेले प्रकल्प, इथली वाहतूक व्यवस्था या सगळ्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे प्रदूषण रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासन आणि नागरिकांसमोर आहे. 

आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन 

मुंबईच्या प्रदूषणात कमालीची वाढ झालीये. मुंबईतील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे मुंबईतील प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकाम, कारणीभूत आहे. दरम्यान राज्य आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

[ad_2]

Related posts