[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Travis Head Century: ओव्हलवर सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड याने शतकी खेळी केली. तो अशी कामगिरी करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात हेड याने दमदार फलंदाजी करत भारताची डोकेदुखी वाढवली. हेड याने 100 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधील हे पहिलेच शतक होय.
भारताने तीन विकेट झटपट घेत चांगली सुरुवात केली होती. पण स्मिथ आणि हेड यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. हेड याने 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतकी खेळी केली. तर स्मिथ याने अर्धशतक झळकावले. चौथ्या विकेटसाठी या जोडीने दीडशतकी भागिदारी केली.
हेडचा विक्रम –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये शतक झळकवणारा ट्रेविस हेड पहिलाच फलंदाज ठरलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा हा दुसरा हंगामा आहे. 2001 मध्ये पहिला हंगाम पार पडला होता. यामध्ये न्यूझीलंड संघाने बाजी मारली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनल सामन्यात एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. अशात हेडने भारताविरुद्ध शतक ठोकत इतिहास रचला आहे. हेड डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
1st to Score Century in Knockout matches
WC – Clive Lloyd (1975)
CT – Sachin Tendulkar (1998)
WTC – Travis Head (2023)*#WTCFinal2023
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) June 7, 2023
इतिहास कोण घडवणार ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये जागतिक कसोटी विजेतेपदासाठी चुरस सुरु झाली आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगली आहे. या अगोदर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून भारत इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना ओव्हलवर श्रद्धांजली, भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर थरार रंगला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कोण पटकावणार ? याकडे जगातील सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. ओव्हल मैदानावर नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने पडला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओव्हल मैदानावर ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक मिनिटांचे मौन पाळत दोन्ही संघातील खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली. दोन्ही संघातील खेळाडू मैदानात दंडावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय एक हजार पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. भारतात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात होय.
[ad_2]