IND vs AUS WTC Final 2023 Day 1 Live Score Updates ICC World Test Championship India vs Australia Match Today; भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन:आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवशी सुरुवात चांगली केली पण ती कामगिरी भारताला काय ठेवता आली नाही आणि ऑस्ट्रेलियाने पहिला दिवस आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हेड आणि स्मिथच्या नाबाद २५१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ३ बाद ३२७ धावा केल्या आहेत. टीम इंडियाला पहिल्या दिवशी केवळ ३ विकेट्स घेण्यातच यश मिळाले आहे.ओव्हल मैदानावर जून महिन्यात होणाऱ्या कसोटी सामन्यात प्रथमच खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल, अशी अपेक्षा होती. खेळपट्टीवरील गवत पाहून फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागेल, असे वाटत होते. अशा स्थितीत संघाने प्रथम गोलंदाजी केल्यास त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातील तसे घडतानाही दिसले. पण नंतर मात्र हे होऊ शकले नाही.

अशा रीतीने ऑस्ट्रेलियाने आजचा पहिला दिवस आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड नाबाद १४६ धावा आणि स्टीव्ह स्मिथ नाबाद ९६ धावांवर खेळत असून तो सुद्धा शतकाच्या जवळ आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाने प्रत्येकी १ विकेट मिळवली.

> पहिल्या दिवसाचा खेळ संपला
ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३२७ धावा केल्या. तर हेड (१४६) आणि स्मिथ (९५) धावांवर खेळत आहेत.

> ट्रेव्हिस हेडचे शतक
ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी ट्रेव्हिस हेडने शतक झळकावले आहे. त्याने १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. या शतकी खेळीत त्याने १४ चौकार आणि १ षटकार लगावला आहे.

> स्टीव्ह स्मिथने झळकावले शानदार अर्धशतक

> टीब्रेक
टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने ५१ षटकांत ३ बाद १७० धावा केल्या आहेत. हेड (६०) आणि स्मिथ (३३) मैदानावर कायम आहेत.

> ट्रेव्हिस हेडचे अर्धशतक
ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने ६० चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले.

WTC मध्ये भरतचा सुपरमॅन अवतार, वॉर्नरही तो कसा आऊट झाला ते बघतच राहिला ; पाहा VIDEO
> ऑस्ट्रेलियाच्या ३० षटकांनंतर १०० धावा पूर्ण, स्मिथ आणि हेडची जोडी मैदानात

> मोहम्मद शमीची धारदार गोलंदाजी
मोहम्मद शमीने लंचब्रेकनंतर २५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर २६ धावांवर लाबुशेनला क्लीन बोल्ड केले.

> लंच ब्रेक
२३ षटकांनंतर पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक झाला आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने ७३ धावा केल्या आहेत. तर भारताला २ मोठ्या विकेट्स मिळवण्यात यश आले आहे. पहिली विकेट सिराजने घेत ख्वाजाला भारतकडून झेलबाद केले तर शार्दूल ठाकूरने वॉर्नरला भरतकडून झेलबाद केले.

> वॉर्नरचे अर्धशतक हुकले
२२व्या षटकाच्या शार्दूलच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर श्रीकर भरतकडून झेलबाद. वॉर्नर ६० चेंडूत ४३ धावा करत बाद झाला.

> १० षटकात ऑस्ट्रेलियाच्या १ बाद २२ धावा- वॉर्नर आणि लाबुशेन जोडी मैदानात

>धमाकेदार सुरुवात
सिराजने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का, उस्मान ख्वाजा शून्यावर बाद- ऑस्ट्रेलिया १ बाद २

> मोहम्मद शमीच्या पहिल्या ओव्हरमध्ये डेव्हिड वॉर्नर थोडक्यात वाचला

> ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सुरुवात- वॉर्नर आणि ख्वाजा जोडी मैदानात, भारताकडून पहिली ओव्हर मोहम्मद शमी

> असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीवन स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकिपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड

> असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

>भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

> ICC नेमकी कशाची इतकी भीती वाटते ज्यामुळे त्यांनी मॅचसाठी दोन पिच तयार केले. जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत मॅच सुरू असताना मध्येच पिच बदलले जाऊ शकते.
WTC फायनलसाठी तयार केले दोन पिच, ICCला वाटते या एका गोष्टीची भीती; वेळ आली तर Pitch बदलणार
> तयारी पूर्ण

> ओव्हलवरील भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड
या मैदानावरील दोन्ही संघांचे रेकॉर्ड चांगले नाही. भारताच्या विजयाची सरासरी ०.४०० तर ऑस्ट्रेलियाची ०.४११ इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने ३८ पैकी फक्त ७ तर भारताने १४ पैकी २ कसोटी जिंकल्या आहेत.

> रोहित कधीच पराभूत झाला नाही
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कधीच फायनल मॅच गमावली नाही. २०१८चा आशिया कप, निदाहास ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला रोहितने ५ वेळा विजेतेपद मिळून दिले आहे.

> ११व्यांदा भारत फायनलमध्ये
भारतीय संघ ११व्यांदा आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी सात नॉकआउट पैकी पाच मध्ये भारताने तर दोन ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. भारताने याआधीच्या आयसीसी स्पर्धेच्या १० पैकी ४ फायनलमध्ये विजय मिळवला आहे. पाच वेळा उपविजेतेपद तर एकदा संयुक्त विजेतेपद मिळवले आहे.

> द ओव्हलपर्यंतचा प्रवास-
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी गेल्या दोन वर्षात प्रत्येकी ६ कसोटी मालिका खेळल्या आहेत. दोघांची या काळातील कामगिरी शानदार अशी ठरली आहे. आता कसोटीचा चॅम्पियन कोण यासाठी हे दोघे लढतील.

[ad_2]

Related posts