Ashok Chavan becomes chief minister as Vilasrao Deshmukh after 26 11 terror attack

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashok Chavan Vilasrao Deshmukh :

राजकारणात जितकी मेहनत महत्वाची तितकचं नशीब सुद्धा…आणि हे नशीब चमकलं कोण कुठून कुठे जाईल हे सांगताही येत नाही…सध्या राज्यात चर्चा सुरु आहे ती अशोक चव्हाण यांची…आणि त्यांचंही नशीब 2008 साली असचं काहीसं चमकलं होतं…विलासराव देशमुखांनी एक चुक केली आणि अशोक चव्हाण थेट मुख्यमंत्री झाले…काय आहे किस्सा? जाणून घेऊ!

नमस्कार…
अशोक चव्हाण…सध्याच्या घडीला राज्यात ट्रेंडिंगवर असणारा नेता…जवळपास अर्धदशक काँग्रेससाठी काम केल्यानंतर चव्हाणांनी आपला प्रवाह आता बदललाय…काँग्रेसचा हात सोडत त्यांनी कमळ पकडलंय आणि थेट भाजपात गेलेत…अशोकरावांचा गाजलेला काळ म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा…ते फक्त 2 वर्ष मुख्यमंत्री होते पण आदर्श घोटाळ्यामुळे देशभरात राडा करुन गेले…पण चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद अगदी नशीबानं मिळालं होतं…

गोष्ट आहे 2008 सालची…26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला..पुढे तिन दिवस ताज हॉटेस…ऑपरा हाऊस अशी मुंबईतील काही प्रमुख ठिकाणी धगधगत होती…अनेकांनी प्राण गमावले…अनेक जवान शहिद झाले…अनेक कुटुंब रस्त्यावर आली…त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते…काँग्रेसचे दिवंगत नेते…विलासराव देशमुख…

हल्ल्यानंतर विलासराव देशमुख…ताज हॉटेलमध्ये पाहणीसाठी दाखल झाले…तो पर्यंत सगळं ठिक होतं…राडा तेव्हा झाला जेव्हा…लोकांनी ताजमध्ये  विलासरावासोबंत त्यांचा मुलगा रितेश देशमुख आणि फिल्म डिरेक्टर राम गोपाल वर्मांना पाहिलं…फिल्मसाठी लागणाऱ्या रेकीसाठी ते तिथे गेले होते… त्यावेळचं वृत्त असं होतं…राम गोपाल वर्मांना 26 11 च्या हल्ल्यावर एक सिनेमा करायचा होता ज्यात ते रितेश देशमुख यांना कास्ट करणार होते… या एका घटनेवरुन विरोधकांनी काँग्रेसला घेरलं आणि टीकांचा भडीमार केला…हा मुद्दा फार Sensetive होता..त्यामुळे काँग्रेसला टीकांना उत्तर देणंही कठीण झालं…प्रकरण इतकं वाढलं की अखेर काँग्रेस हायकमांडचा आदेश आला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले…त्यांनी राजीनामा दिला…

हा मॅटर थंड झाला पण दुसरा मुद्दा होताच…पुढचा मुख्यमंत्री कोण? अनेक नावांची चर्चा झाली…सगळ्याचं ब्रेनस्टॉर्मिंग सुरु असताना सोनिया गांधींनी एक नाव सजेस्ट केलं…सगळ्यांनी संमत्ती दिली आणि नाव फायनल झालं…अशोक शंकरराव चव्हाण!

08 December 2008 रोजी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची शपध घेतली आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले…पुढे 2009 च्या निवडणुकांमध्येही काँग्रेस सरकारलं तेव्हा अशोक चव्हाणच मुख्यमंत्री राहिले…

खरं तर…
अशोकराव पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्यात नशीबाचा खुप मोठा आहे…विलासरावांनी राम गोपाल वर्मांना रेकीसाठी नेण्याची चूक केली नसती तर कदाचित पुढे हे सगळं झालं नसतं…त्यांच्या एका चुकीमुळे अशोकरावांच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं…

[ad_2]

Related posts