ashok chavan exclusive interview after joining bjp amid rajya sabha elections

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashok Chavan Interview : Congress मध्ये कोण खेचत होतं अशोक चव्हाण यांचे पाय? : ABP Majha

Ashok Chavan Interview : काँग्रेलला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या क्षमतेवर भाष्य केलंय. पक्ष सोडताच अशोक चव्हाणांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलय. काँग्रेसमध्ये ना ताळमेळ आहे ना जिंकण्याची जिद्द आहे. वरिष्ठांमध्येच समन्वयाचा आभाव आहे, असे भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले आहेत. अशोक चव्हाण यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते. 

काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते

अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते. पण कधीतरी हा निर्णय घ्यावाच लागणार होता. कारण निवडणूक ही युद्धासारखी असते. त्यासाठी तयारी करावी लागते. जी काँग्रेसमध्ये सध्यातरी दिसत नाही. काँग्रेस सोडताना मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो मी हा निर्णय का घेत आहे? हेही सांगितलं, असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Related posts