अहमदाबाद : शुभमन गिलला अंतिम सामन्यात जीवदान मिळूनही मोठी खेळी साकारता आली नाही. पण गिलने या संपूर्ण स्पर्धेत सातत्याने फलंदाजी केली आणि त्यामुळेच त्याला यावेळी आयपीएलमधील मानाचा पुरस्कार देण्यात आला.शुभमन गिल अंतिम सामन्यात जास्त काही चांगली कामगिरी करू शकला नाही. गिलला या सामन्यात तीन धावांवर असताना जीवदान मिळाले होते. दुसऱ्या षटकात षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडली. या चौथ्या चेंडूवर गिलने चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण तुषारचा चेंडू चांगलाच वेगाने आला होता. त्यामुळे गिलचे टायमिंग चुकले आणि त्याचा फटका बरोबर बसला नाही. त्याच बरोबर चाणाक्ष धोनीने जिथे चेंडू हा मारला जाईल तिथे खेळाडू लावलेला होता. त्यामुळे गिलला आपल्या जाळ्यात अडकवण्यात धोनी यशस्वी ठरला होता. पण यावेळी चूक केली ती चेन्नईच्या दीपक चहरने. कारण गिलने मारलेला हा फटका थेट चहरच्या हातात विसावला होता. त्यामुळे आता गिल बाद होणार हे सर्वांनाच वाटलं होतं. पण यावेळी चहरकडून मोठी चूक घडली.
धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे? विजेतेपदानंतर सांगितले भावनिक कारण…
चहरच्या हातात तर हा चेंडू आला होता पण त्याला तो पकडता आला नाही. हा चेंडू चहरच्या हातून निसटला आणि खाली पडला. त्यामुळे गिलचा झेल सुटला आण त्याला जीवदान मिळाले. पण त्यानंतर धोनीने त्याला बाद करत ही चूक दुरुस्त केली. तेव्हा जरी गिलला बाद करता आले नसले तरी धोनीने सातवे षटक रवींद्र जडेजाला दिले. जडेजाने यावेळी गिलला मोठा फटका मारण्याची पुढे येण्यास आमंत्रित केले आणि त्याला चकवले. बाकीचे काम धोनीने न चुकता केले.
विजयी चौकार मारल्यानंतर जडेजाला फक्त ही एक गोष्ट करायची होती; सर्वांना चकवा देत पाहा काय केलं
धोनीने यावेळी जलदगतीने गिलला यष्टीचीत केले आणि सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. त्यामुळे गिल यावेळी ३९ धावांवर बाद झाला. पण या आयपीएलमध्ये गिल हा सातत्याने धावा करत होता. त्यामुळे त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वात जास्त इम्पॅक्टही त्याचाच पाहायला मिळाला. त्यामुळे यावेळी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं
गिलने या आयपीएलमध्ये धावांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.