Chaos At Us Retail Stores As India Bans Rice Export Know Reasons; भारताकडून तांदूळ निर्यात बंद, अमेरिकेत हाहाकार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: देशात टोमॅटोचे दर भडकलेले असताना, ते कमी करण्यासाठी सरकार पावलं उचलत असताना आता तांदळाच्या निर्यातीबद्दल सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात तांदळाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारनं तांदूळ निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते. अनेक देश तांदळासाठी भारतावर अवलंबून असतात. आता भारतानं तांदूळ निर्यातीवर बंदी आणल्यानं जगभरात महागाई वाढण्याची भीती आहे.

महिन्याभरात तांदळाच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ झाल्यानं तांदळाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. देशभराच्या बहुतांश भागात सध्या मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. याच कारणामुळे तांदळाच्या दरांमध्ये गेल्या महिन्याभरात वाढ झाली आहे. तांदळाचे दर वाढून देशातील परिस्थिती बिघडू नये म्हणून सरकारनं निर्यात बंद केली आहे.
स्वत:ला संपवण्याचा कट, BSF जवानानं कार पेटवली, हाडं सापडली; पण सांगाड्यानंच केस फिरली
अमेरिकेत काय परिणाम?
भारतानं निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचे सर्वाधिक परिणाम अमेरिकेत दिसून आले. अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी दुकानांमध्ये धाव घेत मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केला. काहींनी तर कार्यालयातील बैठका अर्ध्यावर सोडून दुकानं गाठली आणि तांदळाच्या गोणी खरेदी केल्या. अमेरिकेतील दुकानांमध्ये आता तांदळाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

तांदूळ पाहिजे, मग अधिकचं सामान घ्या!
अमेरिकेतील दुकानांमध्ये तांदूळ खरेदीसाठी भारतीयांच्या रांगा लागल्याचं पाहून तिथल्या काही दुकानदारांनी भलताच निर्णय घेतला. तांदळाची एक गोणी हवी असल्यास दुकानातून ५० डॉलरच्या अतिरिक्त वस्तू खरेदी करा, असं फर्मान फ्रेमोंटमधील नमस्ते प्लाझा दुकानानं काढलं. त्यावरुन ग्राहक आणि व्यवस्थापकांमध्ये वाद झाला. कुटुंबातील सदस्य त्यांच्या नातेवाईकांना दर तासानं तांदूळ खरेदी करण्यास पाठवतात. त्यामुळे इतरांना तांदूळ मिळणार नाही. याच कारणास्तव अधिकचा तांदूळ हवा असल्यास अधिकच्या वस्तू खरेदी करा, असा निर्णय घेतल्याचं व्यवस्थापकानं सांगितलं.
ट्रेडमिलवर धावताना कोसळला, जीव सोडला; इंजिनीअरचा विचित्र प्रकारे मृत्यू; PMमधून कारण समोर
तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा किती?
जगातील एकूण तांदूळ निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात भारताकडून होते. रशिया-युक्रेन युद्ध सुरुच असल्यानं त्यांच्याकडून होणारी निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश भारतीय तांदळावर अवलंबून आहे. भारत सरकारनं आता निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानं जगभरात तांदळाचे दर वाढू शकतात. गेल्या १२ महिन्यांत देशात तांदळाचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत.

कोणकोणत्या तांदळाची निर्यात बंद?
भारतानं ज्या श्रेणीतील तांदूळ निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये बासमतीव्यतिरिक्त पांढरा तांदूळ आणि तुकडा तांदूळ यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी भारतानं एकूण २२ मिलियन टन तांदूळ निर्यात केला. त्यात या तांदळाचा हिस्सा १० मिलियन टन होता.
माझ्या लेकाचं भलं होईल! सरकारी भरपाईसाठी जीवावर उदार झाली आई; बससमोर उडी घेत आयुष्याची अखेर
भारत सरकारनं निर्णय का घेतला?
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार महागाईबद्दल संवेदनशील आहे. महागाईचा परिणाम थेट मतदानावर होऊ शकतो आणि त्यामुळे फटका बसू शकतो याची जाणीव असल्यानं सरकारनं तांदूळ निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. याआधी सरकारनं सप्टेंबर २०२२ मध्ये तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणले होते. त्यानंतर गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध वाढवले.

[ad_2]

Related posts