Pakistan Became Number 1 In WTC Points Table If India Not Win IND vs WI 2nd Test ; भारताने कसोटी सामना जिंकला नाही तर पाकिस्तानला कसा होणार फायदा, पाहा संपूर्ण समीकरण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताला जर वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकता आला नाही, तर आता पाकिस्तानला त्याचा फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती आता भारत-वेस्ट इंडिज सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी समोर आली आहे.

भारताने वेस्ट इंडिजमध्ये पहिल्या कसोटीत एका डावाने विजय साकारला होता. आता दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला आठ विकेट्सची गरज आहे. पण सध्याच्या घडीला पावसाने भारताच्या विजयाची वाट अडवली आहे, असे स्पष्ट दिसत आहे. कारण पावसामुळे पाचव्या दिवशीची षटकं कमी झाली आहेत आणि त्यामुळे भारताच्या विजयाची शक्यताही कमी झाली आहे. त्यामुळे भारताला आता हा सामना जिंकता येणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण पावसाने भारताच्या मार्गा अडथळा निर्माण केला आहे, हे मात्र स्पष्ट आहे. त्यामुळे जर यावेळी भारताला विजय मिळवता आला नाही तर त्याचा फायदा पाकिस्तानला होणार आहे.

भारताने विश्व अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पाहिला आहे. त्यानंतर आता नव्याने विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत सध्याच्या घडीला भारताचा संघ हा पहिल्या स्थानावर आहे. कारण भारताने एक सामना खेळला आहे आणि त्यांनी त्यामध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे पाकिस्तानची परिस्थितीदेखील तशीच आहे. पाकिस्तानने पहिल्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केले. त्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी ही भारतासारखीच १०० टक्के एवढी आहे. पण भारताने जर हा सामना जिंकला नाही तर त्यांना १२ गुण मिळणार नाही, सामान अनिर्णीत राहिल्यावर त्यांना त्यापेक्षा कमी गुण मिळतील. त्याचबरोबर भारताची विजयाची टक्केवारी कमी होईल आणि ती १०० टक्के एवढी नक्कीच राहणार नाही. या परिस्थितीत पाकिस्तानचा संघ हा १०० टक्के विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर पोहोचणार आहे. त्यामुळे भारताने सामान जिंकला नाही पाकिस्तानला हा फायदा होणार आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारताच्या विजयाच्या मार्गात पाऊस आला आहे. भारताने हा जर सामना जिंकला नाही तर त्याचा फायदा आता पाकिस्तानला होणार आहे.

[ad_2]

Related posts