Virat Kohli didn’t travel with team to Trinidad, doubtful for 3rd ODI ; भारतीय संघाला सोडून विराट कोहली गायब, वेस्ट इंडिजमध्ये काय घडलं जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद : विराट कोहलीने शतक झळकावले आणि त्यानंतर त्याला थेट संघातूनच बाहेर काढले. त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याचे समोर येत आहे. कारण संघातून बाहेर काढल्यावर विराट कोहली गायब झाल्याची चर्चा आहे. तो संघाबरोबर नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कोहलीला संघाबाहेर करण्यात आले. कोहली या सामन्यात खेळाडूंसाठी खेळाडूंना पाणी आणताना पाहायला मिळाला. विराट हा संघातील वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याच्यावर अशी वेळ यावी, हे दुर्देव असल्याची चर्चा रंगली होती. पण या सामन्यानंतर कोहली गायब असल्याचे आता समोर आले आहे. कारण कोहली हा सध्याच्या घडीला संघाबरोबर नाही.

भारतीय संघाने बार्डाडोसहून त्रिनिदाद असा प्रवास केला. कारण आता तिसरा कसोटी सामना हा त्रिनिदादला होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल झाला आहे. यावेळी जेव्हा भारतीय संघ त्रिनिदादमध्ये उतरला तेव्हा भारताचे सर्व खेळाडू दिसले, पण त्यांच्यामध्ये कोहली मात्र नव्हता. त्यामुळे कोहली आहे तरी कुठे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोहली नेमका कुठे आहे, याबाबत त्याने किंवा बीसीसीआयने अजूनही कोणते स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे कोहली कुठे आहे आणि काय करतोय, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कोहली हा संघाबरोबर नाही, त्यामुळे तो आज सरावही करणार नाही. पण तो तिसरा वनडे सामना खेळणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण तिसऱ्या सामन्यात कोहली आणि रोहित शर्मा यांचे संघात पुनरागमन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण कोहली जर संघाबरोबर नसेल आणि तो कुठे आहे, याचा पत्ता नसेल तर तो तिसऱ्या सामन्यात खेळणार तरी कसा, हा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

विराट कोहली हा सध्याच्या घडीला भारतीय संघाबरोबर नाही. त्यामुळे कोहली रागावला आहे का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. पण याबाबत आता तो काय खुलासा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts