Indapur Well Accident Three Workers Dead Bodies Found Search Operation Of One Person Is Still Going On

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indapur Well Accident : इंदापूरमध्ये विहिरीचं काम सुरु असताना माती खाली पडून चार मजूर अडकले होते. त्यापैकी तीन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता, त्यानंतर 2 तासाने आणखी दोन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. तब्बल 67 तासाने आणखी दोन मृतदेह सापडल्याने आतापर्यंत तीन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत आणखी एका मजुराचा शोध सुरु आहे. जोपर्यंत चौथा कामगार सापडत नाहीत तोपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळावरून हलू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

तीन मजुरांचे मृतदेह सापडले, आणखी एकाचा शोध सुरु

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामुळे चार मजुर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. ही दुर्घटना 1 ऑगस्ट रोजी घडली होती. पण, त्याचा उलगडा रात्री उशिरा झाला, त्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. आता सुमारे तीन दिवसांच्या शोध कार्यानंतर तीन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी एकाचा शोध सुरु आहे.

माती विहिरीत पडल्यानं 4 मजूर अडकले

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण वय आणि मनोज मारुती चव्हाण हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत होते. अचानक त्यांच्यावरती हा मलबा आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढिगार्‍याखाली ही कालपासून अडकले आहेत. ज्यावेळी ही चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही. तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या. मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली.

इंदापूर विहिरीचे काम बेकायदेशीर, नागरिकांचा आरोप

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून चार जण मातीखाली गाठले असल्याने प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम आहे. दुर्घटनेत अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी या घटनेतील चार जण हे बेलवाडी गावचे नागरिक असून विहिरीचे कामे बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे.

[ad_2]

Related posts