Gwalior News: लग्नसमारंभात वऱ्हाड्यांच्या त्या कृतीने नवरदेवाच्या अब्रूचा कचरा, भरावा लागला इतका दंड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मध्य प्रदेश: आता लग्न (Marriage) म्हटलं की गोंधळ हा प्रकार आलाच. कधी कधी या गोंधळामुळे लग्नात नको ती अडचण समोर येऊन उभी राहते. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) समोर आला आहे. लग्नानंतर समारंभस्थळी खूपच कचरा पसरला होता. याप्रकरणी नवरदेवाकडून दंड आकारला गेला. नवरदेवाकडून एक हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. याप्रकरणाची चर्चा संपूर्ण परिसरात होत होती. हा लग्न समारंभ कंपू स्टेशनच्या क्षेत्रातील वॉर्ड ४६ मधील गणेश मंदिरात झाला होता.

दिलीप शाक्य नावाच्या नवरदेवाचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात गणेश मंदिरात झाले होते. लग्नात मोठ्या प्रमाणात लोकही आले होते. जेवणानंतर आलेल्या लोकांनी आजुबाजूच्या रस्त्यावर कचरा टाकला. त्याबरोबरच जेवणही रस्त्यावर फेकून दिले होते. यानंतर शासनाला याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि कारवाई केली. यानंतर नवरदेवावर दंड लावण्यात आला. तसेच पुढे अशी चूक न करण्याचा इशारा दिला.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १५०० वाहनं १५ मिनिटांत वळवली; ट्रॅफिक जॅमचं टेन्शन संपलं

शासनाने नवरदेवाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम देत नवरदेव नवरीला घेऊन घरी गेला. महत्वाची बाब म्हणजे ग्वाल्हेर नगर निगम स्वच्छता राहण्यासाठी शहरात अनेक उपक्रम राबवत आहे. तसेच लोकांनाही स्वच्छता राखण्यास सांगत आहे. शासनाकडून अनेक वेळा लोकांना सांगण्यात येत आहे की, तुम्ही स्वच्छता बाळगा. त्याबरोबरच शहरही स्वच्छ ठेवा. यात मुख्य रस्त्यांची सफाईची विशेष काळजी घेतली जात आहे. या अभियानातंर्गत कचरा करणाऱ्या लोकांवरही कारवाई करण्यात येत आहे.

[ad_2]

Related posts