[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २३३ धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलच्या १२९, साई सुदर्शनच्या ४३ आणि हार्दिक पांड्याच्या २८ धावांचा प्रमुख समावेश होता. तर, मुंबईंच्या गोलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. टीम डेव्हिडनं सोडलेल्या एका कॅचचा मुंबईला जोरदार फटका बसला. टीम डेव्हिडनं शुभमन गिलचा कॅच सोडला होता.
मुंबईच्या डावाची सुरुवात देखील चांगली झाली नाही. २३४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली नेहल वढेरा आणि रोहित शर्माची जोडी मोठी धावसंख्या उभारु शकली नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात नेहल वढेरा आणि रोहित शर्मा बाद झाले. तिलक वर्मानं जोरदार फटकेबाजी करत मंबईच्या आशा कायम ठेवल्या. राशिद खानला मोठा फटका लगावण्याच्या नादात तो ४३ धावा करुन बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीननं जोरदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. कॅमरुन ग्रीन ३० धावांवर तर सूर्यकुमार यादव ६१ धावांवर बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्ठात आल्या. मुंबईचा संघ १७१ धावा करु शकला.
चेन्नईचं ट्विट
मुंबईचा पराभव झाल्यानंतर चेन्नईं देखील लगेच ट्विट केलं.महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांचा फोटो ट्विट करत जिथून सुरुवात झाली होती तिथं पोहोचलो, असं चेन्नईनं म्हटलं आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वाची सुरुवात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यानं झाली होती. तो सामना गुजरातनं ५ विकेटनं जिंकला होता. चेन्नई त्या पराभवाची परत फेड करत विजयावर नाव कोरणार का हे पाहावं लागेल..
[ad_2]