IPL 2023 CSK Tweet After Mumbai Indians Loose Match Against Gujarat Titans; जिथून सुरुवात झाली तिथंच पोहोचलो, मुंबई आयपीएलच्या बाहेर जाताच चेन्नईचं भन्नाट ट्विट चर्चेत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : एलिमिनेटरमध्ये लखनऊवर स्पर्धेतील सर्वात मोठा विजय मिळवत दिमाखात क्वालिफायर २ मध्ये पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सच्या सहाव्या विजेतेपदाचं स्वप्न अखेर भंगलं आहे. आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात हार्दिकच्या संघानं ६२ धावांनी विजय मिळवला तर रोहित शर्माच्या संघाला स्पर्धेबाहेर जावं लागलं. मुंबई इंडियन्सचे सुरुवातीपासून निर्णय चुकत गेले. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी गुजरातला आमंत्रित केलं. गुजरातच्या खेळाडूंनी २० ओव्हरमध्ये २३३ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा सामना करताना मुंबईचा संघ संपूर्ण २० ओव्हर देखील खेळू शकला नाही. मुंबईचा संघ १७१ धावांवर बाद झाला आणि गुजरातनं मुंबईवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर चेन्नईनं केलेलं ट्विट मात्र चर्चेत आहे.

गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २३३ धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलच्या १२९, साई सुदर्शनच्या ४३ आणि हार्दिक पांड्याच्या २८ धावांचा प्रमुख समावेश होता. तर, मुंबईंच्या गोलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. टीम डेव्हिडनं सोडलेल्या एका कॅचचा मुंबईला जोरदार फटका बसला. टीम डेव्हिडनं शुभमन गिलचा कॅच सोडला होता.

चांगला करता आले नाही तर किमान नुकसान करू नये; ईशानला जखमी करून जॉर्डन ठरला मुंबईसाठी व्हिलन
मुंबईच्या डावाची सुरुवात देखील चांगली झाली नाही. २३४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली नेहल वढेरा आणि रोहित शर्माची जोडी मोठी धावसंख्या उभारु शकली नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात नेहल वढेरा आणि रोहित शर्मा बाद झाले. तिलक वर्मानं जोरदार फटकेबाजी करत मंबईच्या आशा कायम ठेवल्या. राशिद खानला मोठा फटका लगावण्याच्या नादात तो ४३ धावा करुन बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीननं जोरदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. कॅमरुन ग्रीन ३० धावांवर तर सूर्यकुमार यादव ६१ धावांवर बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्ठात आल्या. मुंबईचा संघ १७१ धावा करु शकला.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यंदा पेरणीची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? जाणून घ्या…

चेन्नईचं ट्विट

मुंबईचा पराभव झाल्यानंतर चेन्नईं देखील लगेच ट्विट केलं.महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांचा फोटो ट्विट करत जिथून सुरुवात झाली होती तिथं पोहोचलो, असं चेन्नईनं म्हटलं आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वाची सुरुवात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यानं झाली होती. तो सामना गुजरातनं ५ विकेटनं जिंकला होता. चेन्नई त्या पराभवाची परत फेड करत विजयावर नाव कोरणार का हे पाहावं लागेल..

प्रवाशांचा होणारा गोंधळ थांबणार; दादरच्या फलाटांचे क्रमांक बदलणार; असे असतील नवे नंबर्स…

[ad_2]

Related posts